Mumbai airport : एका विमानाचं उड्डाण तर दुसऱ्याचं लँडिंग! मोठी दुर्घटना होता होता टळली...

मुंबई विमानतळाच्या सुरक्षेत झाली मोठी चूक


मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याने हा प्रकार घडला. एकाच धावपट्टीवर दोन विमानांना परवानगी देण्यात आली, मात्र दोन्ही विमाने काहीशा वेळेच्या फरकाने जवळ आल्याने हा अपघात टळला. समोर आलेल्या माहितीनुसार, काल सकाळच्या सुमारास इंडिगोचे (Indigo) विमान रनवेवर उतरत होते, तर एअर इंडियाचे (Air India) विमान टेक ऑफ करण्यासाठी रनवेवर धावत होते त्यावेळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ बाहेर आला आहे.


एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर असतानाच इंडिगो विमानाला उतरण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला होता. एअर इंडियाचं विमान हवेत झेपावत असतानाच इंडिगो विमानाचं लैंडिंग होत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट ५०५३ रनवे क्रमाक २७ वर उतरणार होते. त्याचवेळी एअर इंडियाची फ्लाइट ६५७ टेक ऑफ करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी ही टक्कर वाचली. एअर इंडियाचे विमान है तिरुअनंतपुरमसाठी उड्‌डाण करणार होते अशी माहिती समोर आली आहे.


मुंबई विमानतळावरील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये एअर इंडियाचे विमान रनवेवर वेगाने जात होते, तर त्याचवेळी इंडिगोचे विमान लैंडिंग करत असल्याचे दिसत आहे. मात्र, जेव्हा इंडिगोचे विमान एअर इंडियाच्या विमानाजवळ आले तोपर्यंत एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ केले होते. त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली आहे, असे व्हिडीओत दिसत आहे. आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.


रन वे २७ वर घडलेल्या प्रकाराची DGCA ने केली चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील (ATC) संबंधित कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे