Mumbai Local : मुंबईकरांचे हाल! पहिल्याच पावसाचा मध्य रेल्वेला फटका

  76

मुंबई : मुंबईत पहिल्या पावसाची हजेरी (Mumbai Rain) लागल्याने नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पहिल्याच पावसाचा मध्य रेल्वेला (Central Railway) फटका बसल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच पावसाने मुंबई लोकल (Mumbai Local) सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून त्यांना ऐन पावसात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरु आहेत. तर दुसरीकडे काही स्थानकात धीम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरू आहेत. परिणामी काही भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कामावर तसेच वीकेंड दरम्यान फिरायला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.


दरम्यान, पहाटेपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये संततधार बरसत आहे. हवामान विभागाकडून पुढील ३ ते ४ तास मुंबईसह ठाणे आणि रायगड परिसरात विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री