Mumbai Local : मुंबईकरांचे हाल! पहिल्याच पावसाचा मध्य रेल्वेला फटका

मुंबई : मुंबईत पहिल्या पावसाची हजेरी (Mumbai Rain) लागल्याने नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पहिल्याच पावसाचा मध्य रेल्वेला (Central Railway) फटका बसल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच पावसाने मुंबई लोकल (Mumbai Local) सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून त्यांना ऐन पावसात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरु आहेत. तर दुसरीकडे काही स्थानकात धीम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरू आहेत. परिणामी काही भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कामावर तसेच वीकेंड दरम्यान फिरायला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.


दरम्यान, पहाटेपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये संततधार बरसत आहे. हवामान विभागाकडून पुढील ३ ते ४ तास मुंबईसह ठाणे आणि रायगड परिसरात विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी