Amrita Rao : अमृता राव करणार मोठ्या पडद्यावर कमबॅक!

'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला...


मुंबई : अमृता राव (Amrita Rao) ही बॉलिवूडमध्ये (Bollywood) मोजकेच चित्रपट केलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा शाहिद कपूरसोबतचा (Shahid Kapoor) विवाह चित्रपट फार गाजला. त्यानंतर ती जॉली एलएलबी सिनेमात अर्शद वारसीच्या (Arshad Warsi) गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली होती. सिनेसृष्टीत जास्त न दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपट म्हणजेच जॉली एलएलबीचाच तिसरा भाग असणार आहे. यात अमृता राव अर्शद वारसीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.


सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी ३' (Jolly LLB 3) या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसला होता, तर दुसर्‍या भागात अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत होता. त्याच्या पत्नीची भूमिका हुमा कुरैशीने साकारली होती. पहिल्या दोन्ही भागांमध्ये सौरभ शुक्ला यांनी मुख्य न्यायाधीशाची भूमिका साकारली होती. विशेष बाब म्हणजे सिनेमाच्या तिसर्‍या भागात अर्शद वारसी व अक्षय कुमार हे दोन्ही अभिनेते एकत्र दिसणार आहेत. तर अर्शदच्या पत्नीची भूमिका अमृता राव करणार आहे.


'जॉली एलएलबी'च्या तिसऱ्या भागाचं काही शुटींग राजस्थानमध्ये झालं आहे. हे शूटिंग राजस्थानमधील अत्यंत दुर्गम भागात झाले आहे. त्या ठिकाणच्या रस्त्यावरून एकही वाहन जाऊ शकत नसल्यामुळे तेथे जाण्यासाठी प्रत्येकाला चालत जावे लागत होते. आता शूटिंग मुंबईत होत आहे. यानंतर काही सीन दिल्लीत शूट होणार आहेत. परंतु अद्याप अमृताकडून या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलेलं नाही.


Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या