Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब!

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झाला निर्णय


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपाने (BJP) सर्वाधिक २४० जागा जिंकत मोठा विजय मिळवला, तर काँग्रेस (Congress) ९९ जागा जिंकत विरोधी पक्ष ठरला. त्यामुळे भाजपप्रणित एनडीए (NDA) पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार यावर शिक्कामोर्तब झाले. एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची निवड करण्यात आल्याने मोदी सलग तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधान बनणार आहेत. एनडीएकडून वेगाने हालचाली सुरु असताना इंडिया आघाडीकडून (INDIA Alliance) मात्र अद्याप विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाली नव्हती. आता काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत यावर निर्णय झाला असून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.


काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि इतर सदस्य आणि कार्यकारिणीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.


काँग्रेस पक्षाचे संघटनेचे प्रभारी सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, 'काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुलजी योग्य व्यक्ती आहेत.'' वेणुगोपाल यांना विचारण्यात आले की, या प्रस्तावावर राहुल गांधींची प्रतिक्रिया काय होती? ते म्हणाले, 'यावर माजी राहुल गांधी यांनी आपण विचार करू, असे सांगितले आहे.'


काँग्रेस सीडब्लूसी बैठकीनंतर काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करावे. ही सर्वांची मागणी असून यातूनच काँग्रेस मजबूत होईल. बैठकीनंतर काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले, 'जेव्हाही काँग्रेस पक्षाला राहुल गांधींकडून काही अपेक्षा होत्या, तेव्हा त्यांनी पक्षाच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आज काँग्रेस पक्ष त्यांना देशाचा आवाज सभागृहात बुलंद करण्याची विनंती करतो. यातच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते व्हावे, असे सर्वांचे म्हणणे असून हेच व्हायला हवे. त्यामुळे काँग्रेसकडून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आता राहुल गांधी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या

Bullet Train : "बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला! १५ ऑगस्ट... पहिली गाडी 'या' मार्गावर धावणार; मुंबईत कधी?

मुंबई : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत अनपेक्षित खीळ

Cigarette Price Increase in India : चहा-सुट्टाचा प्लॅन आता 'महागात' पडणार! एका सिगरेटसाठी तब्बल ७२ रुपये? काय आहे सरकारचा नवा नियम

७ वर्षांनंतर उत्पादन शुल्कात मोठी वाढ नवी दिल्ली : देशातील तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत १ फेब्रुवारी २०२६

Explosion In Himachal Pradesh : हिमाचलमध्ये नववर्षाची सुरुवात हादरवणारी! नालागढमध्ये शक्तिशाली स्फोट, आर्मी हॉस्पिटलच्या काचांचा पडला खच

सोलन : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालागढ

Vande Bharat Sleeper Train Route : ठरलं! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार; प्रवाशांची प्रतीक्षा संपली!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाने आता एक मोठी झेप घेतली असून, देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर'

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार