Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग बंद होण्याची शक्यता

संगमेश्वरच्या धामणीत रस्ता खचला


संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) संगमेश्वरमधील धामणी येथे संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे धामणी येथील रेल्वे ब्रीजच्या जवळ महामार्गावरील वाहतूक आता धोकादायक बनली आहे. आता प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर मुंबई गोवा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.


गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. अशा स्थितीत पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावरील ही परिस्थिती समोर आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्गावरील संगमेश्वरजवळील संरक्षक भिंतीचे आणि रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याचा फटका आता नुकत्याच झालेल्या पावसात बसल्याचे दिसून आले. या ठिकाणचा रस्ता आता खचताना दिसत आहे.


डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


अशीच परिस्थिती कायम राहिली तर या महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खचणाऱ्या रस्त्याला कुठेही पर्यायी मार्ग नाही. येत्या चार दिवसात कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच हा भराव अधिक खचत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे ऐन पावसाच्या सुरुवातीला मुंबई गोवा महामार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची