Delhi Fire : अग्नितांडव! दिल्लीतील फूड फॅक्टरीला भीषण आग

तिघांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी


नवी दिल्ली : उन्हाच्या कडाक्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना देशाची राजधानी दिल्ली येथेही अशीच एक घटना घडली आहे. दिल्ली येथील (Delhi) नरेला परिसरातील एका फूड फॅक्टरीला (Food Factory) आज पहाटे भीषण आग (Fire News) लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील या अग्नितांडवामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील फूड फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी डाळ भाजण्याचे काम सुरु होते. त्यावेळी आगीचा अचानक भडका उडाल्याने संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी आला. आग लागल्याचे कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. मात्र काही कामगारांना वेळीच बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत अनेक कामगार अडकले होते. परंतु अग्निशमन दलाच्या विभागाकडून (Fire Brigade) अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे.



जखमींची माहिती


अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता यामध्ये श्याम (२४), राम सिंग (३०) बीरपाल (४२)या तिघांना मृत घोषित केले. आणि इतर ६ कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर एसएचआरसी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.


दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात कच्चे मूग गॅस बर्नरवर भाजले जात असल्याचे समोर आले आहे. गॅस लीक झाल्यामुळे आग पसरली, ज्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम झाला आणि स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक

BRICS : दिल्लीत १४ आणि १५ मे रोजी ब्रिक्स शिखर परिषद

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध, युक्रेन संघर्ष आणि ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर,

Sanjay Kapoor Property Dispute : 'कपूर संपत्ती प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल'

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक

NEET-UG 2026 : पेपरफुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली, आता पुढे काय होणार ?

नवी दिल्ली : पेपरफुटी झाल्याचे उघड झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी रविवार ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली 'नीट' (NEET-UG

NEET UG 2026 : 'नीट' पेपर फुटीचं केरळ कनेक्शन! ४२ तास आधीच फुटला होता पेपर; परीक्षा अखेर रद्द; सीबीआय करणार चौकशी

२२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक

Assam Himanta Biswa Sarma Oath : आसाममध्ये पुन्हा 'बिस्वा'राज! हिमंत बिस्वा सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

गुवाहाटी : आसामच्या राजकीय इतिहासात मंगळवारी (१२ मे) एका नव्या पर्वाची नोंद झाली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता