Mhada : सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार

म्हाडा उभारणार तब्बल ३६०० घरे


मुंबई : गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्य लोक म्हाडा (Mhada) आणि सिडकोकडून (CIDCO) उपलब्ध होणाऱ्या घरांची वाट पाहात असतात. अशातच मुंबईत घर घेण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती मिळत आहे. म्हाडा मुंबईत (Mumbai) घरे उभारण्याच्या तयारीत असल्यामुळे आता सर्वसामान्यांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून दरवर्षी घरांची लॉटरी काढली जाते. म्हाडाच्या इतर मंडळाच्या तुलनेत मुंबईमधील घरांना नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षी म्हाडाने मुंबईत ४,०८२ घरांची लॉटरी काढली होती. यामध्ये तब्बल १ लाख २२ हजार अर्ज प्राप्त झाले होते. आता या आर्थिक वर्षात म्हाडा मुंबईत ३,६०० घरे उभारण्याचे नियोजन केले आहे. मुंबई शहरासह उपनगरातही घरे असणार आहेत. यामध्ये अ‍ॅण्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर, मागाठाणे, पहाडी गोरेगाव अशा विविध ठिकाणी ही घरे असणार आहेत.



वर्षभरात १३ हजार घरांची निर्मिती


म्हाडाच्या प्रत्येक मंडळाकडून वर्षभारत किमान एक लॉटरी काढली जाते. त्यानुसार या आर्थिक वर्षात मुंबईसह पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती येथे सुमारे १२ ते १३ हजार घरांची निर्मिती करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील