‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ मार्गिकेने गाठला प्रवासी संख्येचा दहा कोटींचा पल्ला

मुंबई : ‘दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर-गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येत अखेर वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या दोन लाख ६० हजार ४७१ वर पोहोचली आहे.


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरील २० किमी लांबीचा दहिसर – डहाणुकरवाडी – आरे दरम्यानचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये सेवेत दाखल केला. जानेवारी २०२३ मध्ये दुसरा टप्पा सेवेत दाखल झाला आणि ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिका कार्यान्वित झाली.


ही मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. सुरुवातीला काही हजारांवर असलेली दैनंदिन प्रवासी संख्या हळूहळू लाखांवर गेली. आतापर्यंत या दोन्ही मार्गिकांवरून दिवसाला दोन लाख ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. पण आता मात्र यात वाढ झाली असून दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाख ६० हजार ४७१ वर पोहोचल्याची माहिती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून (एमएमएमओसीएल) देण्यात आली.


दरम्यान, गेल्या आठवड्यात या दोन्ही मार्गिकांवरील एकूण प्रवासी संख्येने दहा कोटींचा पल्ला गाठला आहे.

Comments
Add Comment

दिवाळी रॉकेटमुळे बोरिवलीत मोठी आग; दुकाने जळून लाखोंचे नुकसान

मुंबई: कफ परेडमधील मच्छिमार नगर येथे सोमवारी पहाटे एका चाळीमध्ये लागलेल्या आगीत १५ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात