Surya Gochar : सूर्याचे होणार परिवर्तन! 'या' राशींचे उजळणार भाग्य

जाणून घ्या तुमची रास आहे का यात...


मुंबई : वैदिक ज्योतिषात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्यदेवाच्या राशीमधील परिवर्तनामुळे (Surya Gochar) त्या राशीच्या व्यक्तीचे जीवन उजळू शकते. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालानंतर संक्रमण करतात. त्यानंतर सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतो. इतर ग्रहांप्रमाणे सूर्यदेखील प्रत्येक महिन्यात राशीत (Horoscope) परिवर्तन करतो. जून महिन्यात देखील सूर्याचं संक्रमण होणार आहे. त्यानुसार काही राशींना या गोष्टीचा फायदा होणार आहे.


ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य १५ जून रोजी रात्री १२ वाजून १६ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत संक्रमण केल्याने काही राशींवर याचा चांगला परिणाम होणार आहे. तर, काही राशींना या काळात सावध राहण्याची गरज आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.



मेष रास (Aries Horoscope)


ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा मेष राशीच्या पंचम चरणाचा स्वामी आहे. सूर्याचा तिसऱ्या चरणात प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून लाभ मिळेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. त्यासोबत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.



मिथुन रास (Gemini Horoscope)


सूर्य मिथुन राशीच्या तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाचा मिथुन राशीच्या लोकांवर चांगला परिणाम दिसून येणार आहे. या दरम्यान रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांनाही याचा चांगलाच लाभ होणार आहे. पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती चांगली राहण्याचा अंदाज आहे.



कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, करिअरमध्ये देखील चांगले सकारात्मक परिणाम दिसून येतील. या कालावधीत तुम्ही परदेशी जाण्याचा विचार देखील करू शकता. तुमच्या व्यवहारात चांगला नफा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा

Breaking News : पोलीस महासंचालक पदासाठी ‘या’ ७ अधिकाऱ्यांची नावे 'शॉर्टलिस्ट'; सदानंद दातेंसह ‘हे’ आयपीएस शर्यतीत!

राज्याच्या गृहविभागाकडून UPSCकडे नावांची यादी रवाना; रश्मी शुक्ला ३१ डिसेंबरला निवृत्त होणार मुंबई :

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे