Surya Gochar : सूर्याचे होणार परिवर्तन! ‘या’ राशींचे उजळणार भाग्य

Share

जाणून घ्या तुमची रास आहे का यात…

मुंबई : वैदिक ज्योतिषात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्यदेवाच्या राशीमधील परिवर्तनामुळे (Surya Gochar) त्या राशीच्या व्यक्तीचे जीवन उजळू शकते. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालानंतर संक्रमण करतात. त्यानंतर सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतो. इतर ग्रहांप्रमाणे सूर्यदेखील प्रत्येक महिन्यात राशीत (Horoscope) परिवर्तन करतो. जून महिन्यात देखील सूर्याचं संक्रमण होणार आहे. त्यानुसार काही राशींना या गोष्टीचा फायदा होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य १५ जून रोजी रात्री १२ वाजून १६ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत संक्रमण केल्याने काही राशींवर याचा चांगला परिणाम होणार आहे. तर, काही राशींना या काळात सावध राहण्याची गरज आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.

मेष रास (Aries Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा मेष राशीच्या पंचम चरणाचा स्वामी आहे. सूर्याचा तिसऱ्या चरणात प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून लाभ मिळेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. त्यासोबत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

मिथुन रास (Gemini Horoscope)

सूर्य मिथुन राशीच्या तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाचा मिथुन राशीच्या लोकांवर चांगला परिणाम दिसून येणार आहे. या दरम्यान रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांनाही याचा चांगलाच लाभ होणार आहे. पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती चांगली राहण्याचा अंदाज आहे.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, करिअरमध्ये देखील चांगले सकारात्मक परिणाम दिसून येतील. या कालावधीत तुम्ही परदेशी जाण्याचा विचार देखील करू शकता. तुमच्या व्यवहारात चांगला नफा होण्याची शक्यता आहे.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…

4 hours ago

जनहितैषी अर्थसंकल्प!

ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…

7 hours ago

एनडीए सरकारचा नवा संकल्प हवा

रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…

7 hours ago

एनटीएच्या अक्षम्य घोडचुका…

हरीश बुटले, करिअर सल्लागार पेपरफुटी किंवा सॉल्व्हर गँग हे समाजकंटक आणि नतद्रष्ट लोकांचे काम आहे…

8 hours ago

पैसाच पैसा, टी-२० वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल, रनर-अप संघावरही कोट्यावधींचा पाऊस

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण…

10 hours ago

Jio आणि Airtel युजर्स स्वस्तामध्ये करू शकता रिचार्ज, २ जुलैपर्यंत आहे संधी

मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स…

11 hours ago