Surya Gochar : सूर्याचे होणार परिवर्तन! 'या' राशींचे उजळणार भाग्य

जाणून घ्या तुमची रास आहे का यात...


मुंबई : वैदिक ज्योतिषात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्यदेवाच्या राशीमधील परिवर्तनामुळे (Surya Gochar) त्या राशीच्या व्यक्तीचे जीवन उजळू शकते. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालानंतर संक्रमण करतात. त्यानंतर सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतो. इतर ग्रहांप्रमाणे सूर्यदेखील प्रत्येक महिन्यात राशीत (Horoscope) परिवर्तन करतो. जून महिन्यात देखील सूर्याचं संक्रमण होणार आहे. त्यानुसार काही राशींना या गोष्टीचा फायदा होणार आहे.


ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य १५ जून रोजी रात्री १२ वाजून १६ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत संक्रमण केल्याने काही राशींवर याचा चांगला परिणाम होणार आहे. तर, काही राशींना या काळात सावध राहण्याची गरज आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.



मेष रास (Aries Horoscope)


ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा मेष राशीच्या पंचम चरणाचा स्वामी आहे. सूर्याचा तिसऱ्या चरणात प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून लाभ मिळेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. त्यासोबत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.



मिथुन रास (Gemini Horoscope)


सूर्य मिथुन राशीच्या तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाचा मिथुन राशीच्या लोकांवर चांगला परिणाम दिसून येणार आहे. या दरम्यान रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांनाही याचा चांगलाच लाभ होणार आहे. पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती चांगली राहण्याचा अंदाज आहे.



कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, करिअरमध्ये देखील चांगले सकारात्मक परिणाम दिसून येतील. या कालावधीत तुम्ही परदेशी जाण्याचा विचार देखील करू शकता. तुमच्या व्यवहारात चांगला नफा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट 'आशा'ची विशेष स्क्रीनिंग! आशा सेविकांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई: जागतिक कन्या दिनानिमित्त 'आशा' या चित्रपटचे विशेष स्क्रिनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडले. या विशेष

'मनाचे श्लोक' चित्रपटाबाबत मृण्मयीचा मोठा निर्णय! 'या' तारखेला पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपट

मुंबई: अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी राज्यभर

संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण

देशातील मतदार यादींचे गहन पुनरावलोकन (एसआयआर) लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक

आंध्र प्रदेशात उभारणार आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर

टेक कंपनी गुगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील

तुंबाडची ७ वर्षे, सोहम शाह यांनी चित्रपटामागील स्वप्न उलगडले!

मुंबई : जेव्हा तुंबाड (२०१८) प्रदर्शित झाला तेव्हा त्याने सर्व चित्रपट शैलींच्या सीमा तोडून स्वतःसाठी एक वेगळे

कबुतरांसाठी जैन मुनींची राजकारणात उडी

मुंबई  : मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या