Nanded Crime : धक्कादायक! शेताच्या बांधावर आढळला विचित्र अवस्थेतील मृतदेह

पायात जोडवी, हातात बांगड्या अन् अर्धवट जळालेले...


नांदेड : काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा जंगलात एक विचित्र अवस्थेतील मृतदेह आढळला होता. ते प्रकरण ज्वलंत असतानाच माहूर तालुक्यात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहूर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावरील एका शेतात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या बांधावर हा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नेमकं प्रकरण काय?


काल रात्री नांदेड जिल्ह्यातील हिळवणी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. शेतातील लाकूडफाटा घेऊन हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माहूर -किनवट या राष्ट्रीय महामार्गाजवळ तुळशीराम राठोड यांचे शेत आहे. या शेतात रात्री मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने राठोड हे शेताकडे आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. सर्व आग विझल्यावर त्या ठिकाणी अज्ञात महिला जळालेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी माहूर पोलीसांना माहिती दिली.



घात की अपघात


या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या हातात बांगड्या आणि पायात जोडवे दिसून आले आहेत. या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा आढळून आला नाही. तर या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.


दरम्यान, हिळवणी गावात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर हा घातपात होता की आत्महत्या याचा पोलीस कडक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी