Monsoon in Maharashtra : खूशखबर! महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन! ‘या’ भागात मुसळधार!

पुणे : मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती. आता मात्र नागरिकांसाठी चांगली खूशखबर मिळाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाचे आज आगमन (Monsoon in Maharashtra) झाले असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली.


राज्यात आज नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. कोकणातील रत्नागिरी त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर ते मेडक, भद्राचलम, विजयनगर आणि बंगालची खाडी या परिसरात पाऊस सुरू झाला आहे. राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे.





काही दिवसांपूर्वी रेमल चक्रीवादळाने धडक दिली होती. त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा वेग वाढला होता. मान्सून वेगाने बंगालच्या खाडीकडे पोहोचला. याच कारणामुळे मान्सून आता वेगाने पूर्वोत्तर राज्यांकडे मार्गक्रमण करू लागला आहे. रेमल वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह पूर्वोत्तर भारतातील राज्यांत जोरदार पाऊस पडला होता.


साधारणपणे अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम या राज्यांत मान्सूनची एन्ट्री ५ जूनपासून होते. परंतु, मान्सूनची सध्याची गती पाहता एक ते दोन दिवस आधीच या भागात मान्सून दाखल झाला. आयएमडीने असा अंदाज व्यक्त केला होता की दक्षिण अरब समुद्र, लक्षद्वीप आणि बंगालच्या खाडीतील विविध ठिकाणी मान्सून पुढे सरकणार आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या पाऊस होईल असा अंदाज आहे.

Comments
Add Comment

Latur : शिवराज मोटेगावकरांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस; अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले

लातूर : लातूर ग्रामीणमधील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११४ मधील बांधकाम प्रकरणी विकासक Shivraj Motegaonkar यांना

Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

लातूर : लातूरच्या शिक्षण व्यवसायावर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर

Gadchiroli : गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांनी आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ‘ऑपरेशन

Maharashtra HSC Marksheet Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून मिळणार मूळ गुणपत्रिका

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची

CM Fadnavis's Journey by Vande Bharat Train : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला वन्दे भारतने प्रवास, प्रवासादरम्यान केले फाईल्सचे कामही पूर्ण

मुंबई : पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी बाईकवरून विधान भवनात

Mango Juice Caused Poisoned : "आंब्याचा रस पिल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना झाली विषबाधा !"

अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.