Agniveer scheme : अग्निवीर योजनेमुळे प्रचंड असंतोष; याचा पुनर्विचार करावा!

जेडीयू नेते केसी त्यागींची नरेंद्र मोदींकडे मागणी


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल लागला आणि यात एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाले , मात्र भाजपाला (BJP) अपेक्षेप्रमाणे जागा जिंकता आलेल्या नाहीत तसेच पूर्ण बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे मित्रपक्षांच्या साथीने भाजपा सत्ता स्थापन करणार आहे. त्यात जेडीयू (JDU) आणि टीडीपी (TDP) या पक्षांची भाजपाला मोलाची साथ लाभणार आहे. मात्र, त्यासाठी भाजपाला काही वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात शपथविधी सोहळ्यापूर्वीच मित्रपक्षांचा प्रभाव दिसू लागला आहे.


एनडीएच्या महत्त्वाच्या मित्रपक्षांपैकी एक असलेल्या जेडीयूने सैन्य भरती योजना अग्निवीर (Agniveer scheme) आणि समान नागरी संहितेबाबत (Uniform Civil Code) मोठी गोष्ट सांगितली आहे. जेडीयू नेते केसी त्यागी (KC Tyagi) म्हणाले की, अग्निवीर योजनेबाबत पुन्हा विचार करण्याची गरज आहे. त्यागी म्हणाले की, यासोबतच समान नागरी संहितेबाबत सर्व राज्यांशी चर्चा व्हायला हवी. अग्निवीर योजनेला मोठा विरोध होत असल्याचे जेडीयूने म्हटले आहे. यावेळच्या आंदोलनाचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आल्याचे ते म्हणाले.


जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, अग्निवीर योजनेबाबत नव्याने विचार करण्याची गरज आहे. निवडणुकीत अग्निवीर योजनेला विरोध झाल्याचे ते म्हणाले. या विरोधाचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून आला. काँग्रेसने सार्वत्रिक निवडणुकीत अग्निवीरला मोठा मुद्दा बनवला होता. सत्तेत आल्यानंतर अग्निवीर योजना डस्टबिनमध्ये फेकून देऊ, असे काँग्रेसने स्पष्टपणे सांगितले होते. त्याच वेळी, ज्या राज्यांमध्ये अग्निवीर योजनेंतर्गत सर्वाधिक नोकरभरती करण्यात आली त्या राज्यांमध्येही भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. हरियाणात पक्षाच्या जागा १० वरून ५ वर आल्या. इतकेच नाही तर पक्षाचा मताधिक्यही ५८ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर घसरला. पंजाबमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. राजस्थानमध्येही भाजप २४ वरून १४ वर घसरला.


त्यागी म्हणाले की, समान नागरी संहितेबाबत आमची भूमिका आजही स्पष्ट आहे. यूसीसीबाबत सर्व राज्यांशी चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, समान नागरी संहितेबाबत राज्यांचे मत समजून घेण्याची गरज आहे. त्यागी म्हणाले की, जेडीयू एक राष्ट्र, एक निवडणुकीच्या समर्थनात आहे.



काय आहे अग्निवीर योजना आणि त्यातील वाद?


अग्निपथ योजना अग्निवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्ससाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांची भरती करते. त्यांची भरती थेट शैक्षणिक संस्थांमधून किंवा भरती रॅलीद्वारे केली जाते. सैनिकांनी पेन्शनसाठी पात्रतेशिवाय चार वर्षांच्या कालावधीसाठी सेवा करणे अपेक्षित आहे. सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्याचा संभाव्य परिणाम, सशस्त्र दलांची व्यावसायिकता आणि नागरी समाजाच्या संभाव्य सैन्यीकरणाबाबत दिग्गज आणि इच्छुकांनी चिंता व्यक्त केल्यामुळे योजनेच्या अटींमुळे वाद निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

Crime News : प्रियकरासाठी पतीचा 'गेम', आधी छतावरून फेकलं, मग रुग्णालयात केला 'काम तमाम'

नर्स पत्नीची क्रूरता पाहून पोलीसही हादरले; पतीला मारण्यासाठी आखला प्लॅन  तेलंगणा : तेलंगणामध्ये विवाहबाह्य

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी