Health: ऱोज सकाळी खा भिजवलेले अक्रोड, शरीरात येईल ताकद

मुंबई: आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये अनेकजण कमकुवतपणा आणि थकवा येत असल्याची तक्रार करत असतात. कमकुवतपणा आणि थकव्यामुळे व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील कामेही प्रभावित होत असतात.


थकवा तसेच कमजोरीपासून दूर राहण्यासाठी आपल्याला संतुलित जेवण करणे गरजेचे असते. सोबतच आपल्या डाएटमध्ये काही अतिरिक्त पोषकतत्वांनी भरलेल्या पदार्थांचा समावेश करणेही गरजेचे असते.


येथे आम्ही तुम्हाला अशा पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या रोजच्या सेवनाने तुम्ही शरीरातील कमजोरी आणि थकवा दूर करू शकता तसेच शरीरात ताकद निर्माण होईल.


या पदार्थाचे नाव आहे अक्रोड. अक्रोडमध्ये प्रोटीन, फॅट, फायबर, फायटोस्टेरॉल, ओमेगा ३ फॅटी अॅसिड सारखी तत्वे आढळतात जे शरीराला आतून ताकद देतात.


अक्रोड हा अल्फा लिनोलेनिक अॅसिडचा मोठा स्त्रोत आहे. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. अक्रोडमध्ये आढळणारी पोषकतत्वे ही त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच एजिंगची लक्षणे कमी करतात.


अक्रोडमध्ये जी अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हृदयरोग आणि कॅन्सरची जोखीम कमी होते.


अक्रोड वजन कमी करण्यास मदत होते कारण यात आढळणारी पोषकतत्वे मेटाबॉलिज्म वेगवान करण्यात मदत करतात तसेच शरीराची चरबी घटवतात.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर