Health: ऱोज सकाळी खा भिजवलेले अक्रोड, शरीरात येईल ताकद

मुंबई: आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये अनेकजण कमकुवतपणा आणि थकवा येत असल्याची तक्रार करत असतात. कमकुवतपणा आणि थकव्यामुळे व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील कामेही प्रभावित होत असतात.


थकवा तसेच कमजोरीपासून दूर राहण्यासाठी आपल्याला संतुलित जेवण करणे गरजेचे असते. सोबतच आपल्या डाएटमध्ये काही अतिरिक्त पोषकतत्वांनी भरलेल्या पदार्थांचा समावेश करणेही गरजेचे असते.


येथे आम्ही तुम्हाला अशा पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या रोजच्या सेवनाने तुम्ही शरीरातील कमजोरी आणि थकवा दूर करू शकता तसेच शरीरात ताकद निर्माण होईल.


या पदार्थाचे नाव आहे अक्रोड. अक्रोडमध्ये प्रोटीन, फॅट, फायबर, फायटोस्टेरॉल, ओमेगा ३ फॅटी अॅसिड सारखी तत्वे आढळतात जे शरीराला आतून ताकद देतात.


अक्रोड हा अल्फा लिनोलेनिक अॅसिडचा मोठा स्त्रोत आहे. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. अक्रोडमध्ये आढळणारी पोषकतत्वे ही त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच एजिंगची लक्षणे कमी करतात.


अक्रोडमध्ये जी अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हृदयरोग आणि कॅन्सरची जोखीम कमी होते.


अक्रोड वजन कमी करण्यास मदत होते कारण यात आढळणारी पोषकतत्वे मेटाबॉलिज्म वेगवान करण्यात मदत करतात तसेच शरीराची चरबी घटवतात.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण