NDA Government : एनडीएचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा!

नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी भाजपला सोपवलं समर्थन पत्र


नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result 2024) जाहीर झाला व २९३ जागांसह एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, त्यासोबतच इंडिया आघाडीनेही (INDIA Alliance) २३४ जागांसह चांगली कामगिरी केली. यातील देशपातळीवर मुख्य लढत असलेल्या भाजपा (BJP) व काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही.


त्यामुळे यंदा सत्तास्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांची भूमिका किंगमेकरची ठरणार होती. त्यामुळे आता नेमकं कोणाचं सरकार स्थापन होणार याबाबत देशवासियांची उत्सुकता ताणली गेली होती. ही उत्सुकता आता संपली असून देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.


लोकसभेचा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएच्या विजयी खासदारांची व प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्याचप्रमाणे इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली होती. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नितीश कुमारांशी संपर्क साधल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. त्यामुळे एनडीएच्या सत्तास्थापनेत अडचण निर्माण होणार की काय , अशी परिस्थिती निर्माण झाली होती.


दरम्यान, बहुमत मिळाल्यानंतर एनडीएची राजधानी दिल्लीमध्ये पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीत १६ घटक पक्षांनी भाजपला समर्थन पत्र सोपवलं आहे. शिवाय नितीस कुमार व चंद्राबाबू नायडू यांनीही भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आपलं पाठिंब्याचं पत्र सोपवलं आहे. या निर्णयामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठा दिलासा मिळाला असून एनडीएचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

तेल आयात सोडा, ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार

देशात तयार होणार सुखोई सुपरजेट नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले

चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार

पुढील पाच दिवसांत काही राज्यांना पावसाचा इशारा! मुंबई : बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोंथा चक्रीवादळ, अरबी

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने