NDA Government : एनडीएचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा!

नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी भाजपला सोपवलं समर्थन पत्र


नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result 2024) जाहीर झाला व २९३ जागांसह एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, त्यासोबतच इंडिया आघाडीनेही (INDIA Alliance) २३४ जागांसह चांगली कामगिरी केली. यातील देशपातळीवर मुख्य लढत असलेल्या भाजपा (BJP) व काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही.


त्यामुळे यंदा सत्तास्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांची भूमिका किंगमेकरची ठरणार होती. त्यामुळे आता नेमकं कोणाचं सरकार स्थापन होणार याबाबत देशवासियांची उत्सुकता ताणली गेली होती. ही उत्सुकता आता संपली असून देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.


लोकसभेचा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएच्या विजयी खासदारांची व प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्याचप्रमाणे इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली होती. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नितीश कुमारांशी संपर्क साधल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. त्यामुळे एनडीएच्या सत्तास्थापनेत अडचण निर्माण होणार की काय , अशी परिस्थिती निर्माण झाली होती.


दरम्यान, बहुमत मिळाल्यानंतर एनडीएची राजधानी दिल्लीमध्ये पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीत १६ घटक पक्षांनी भाजपला समर्थन पत्र सोपवलं आहे. शिवाय नितीस कुमार व चंद्राबाबू नायडू यांनीही भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आपलं पाठिंब्याचं पत्र सोपवलं आहे. या निर्णयामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठा दिलासा मिळाला असून एनडीएचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने