Share Market : शेअर मार्केटच्या भूकंपानंतर 'या' कंपनीने गाठला उच्चांक!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या (Loksabha Election Result 2024) दिवशी शेअर बाजारात (Share Market) भूकंप झाला. या वातावरणामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. गुंतवणूकदारांचा जवळपास १० लाख रुपयांचा चुराडा झाला होता. मात्र या शेअर बाजाराने पुन्हा यू-टर्न घेतला आहे. शेअर मार्केटच्या भूकंपानंतर एका वाहन कंपनीने तुफान स्पीड पकडला असून उच्चांक गाठला आहे.



या कंपनीने गाठला उच्चांकी स्तर


शेअर्स खरेदीसाठी उड्या दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) लिमिटेडचा शेअर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी ८.७ टक्क्यांनी वाढून ५,७७५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे. हीरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये आतापर्यंत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.


दरम्यान, या शेअरने वर्ष २०२४ मध्ये ३८ टक्के सकारात्मक परतावा दिला आहे. हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा (५८ टक्के परतावा) आणि बजाज ऑटो (४० टक्के परतावा) हे निफ्टी ५० निर्देशांकातील तीन सर्वोत्तम कामगिरी करणारे शेअर्स आहेत. तसेच ग्रामीण वापरातील वाढ किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील पुनरुज्जीवन हे हीरो आणि बजाज ऑटोसारख्या दुचाकी उत्पादकांसाठी फायदेशीर आहेत. आणि त्यांच्या एन्ट्री लेव्हल बाईकची विक्री वाढण्याची शक्यता आहे, असे शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी म्हटले आहे.



कंपनीचा तिमाही निकाल


गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत हीरो मोटोकॉर्पचा नफा १६.७ टक्क्यांनी वाढून ९४३.४६ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या (जानेवारी ते मार्च) तिमाहीत कंपनीचा नफा ८१०.८० कोटी रुपये होता. या तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न ९,६१६.६८ कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षी या कालावधीत ८,४३४.२८ कोटी रुपये होते.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च