Loksabha election 2024: रायबरेलीतून राहुल गांधींचा मोठा विजय, ३ लाख ९० हजार मतांनी जिंकले

रायबरेली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून तब्बल ३ लाख ९० हजार मतांनी जिंकून आले आहेत.


यंदाची निवडणूक ही राहुल गांधीच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती. यावेळचा विजय हा राहुल गांधींसाठी खास आहे. गांधी कुटुंबातील तिसरी पिढी म्हणून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते आणि संपूर्ण देशाची नजर रायबरेलीच्या निकालावर होती. तर काँग्रेसचा गड जिंकता न आल्याने भाजपच्या गोटात मात्र नाराजी आहे.


यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात देशातील इतर पक्ष एकत्र झाले होते. या निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी देशभरात यात्रा काढली होती.


दरम्यान, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. राहुल गांधीच्या रायबरेली मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह उभे होते.

Comments
Add Comment

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

Share Market Update : जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे; आशियामध्ये संमिश्र व्यवहार

मुंबई : आज जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे दिसत आहेत. मागील सत्रात अमेरिकन बाजारपेठा घसरणीसह बंद झाल्या.

Rajnath Singh : भारत भविष्यात इराण-अमेरिका यांच्यात मध्यस्थीची भूमिका निभावू शकतो - राजनाथ सिंह

नवी दिल्ली : जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका यांच्यातील