Piyush Goyal : उत्तर-मुंबईत पियुष गोयल यांचा दणदणीत विजय

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतितटीची लढत सुरू असताना उत्तर-मुंबईचा (North Mumbai) गड भाजपच्या पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सर केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील (Bhushan Patil) यांचा दारुण पराभव केला.


मुंबईतील लोकसभेची जागा उत्तर मुंबई ही भाजपासाठी २००४ आणि २००९चा अपवाद वगळता सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. १९८९ पासून लागोपाठ भाजपने उत्तर मुंबईचा गड राखला आहे. मात्र यावेळी भाजपकडून दोन वेळा खासदार राहिलेला गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.


जातीय समीकरण, भाषेचा मुद्दा, भूमिपुत्रांचा मुद्दा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अवतीभोवती मुंबईतील सहाही लोकसभा जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. या मतदारसंघात देखील मराठी - अमराठी किंवा बाहेरून आलेला उमेदवार अशा प्रकारचा प्रचार महाविकास आघाडीकडून केला गेला.


मात्र विरोधकांच्या प्रचाराच्या सर्व मुद्द्यांना मागे सारत भाजपचा गेल्या कित्येक वर्षांपासून बालेकिल्ला असलेला हा गड गोयल यांनी कायम राखला आहे.

Comments
Add Comment

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे