मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतितटीची लढत सुरू असताना उत्तर-मुंबईचा (North Mumbai) गड भाजपच्या पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सर केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील (Bhushan Patil) यांचा दारुण पराभव केला.
मुंबईतील लोकसभेची जागा उत्तर मुंबई ही भाजपासाठी २००४ आणि २००९चा अपवाद वगळता सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. १९८९ पासून लागोपाठ भाजपने उत्तर मुंबईचा गड राखला आहे. मात्र यावेळी भाजपकडून दोन वेळा खासदार राहिलेला गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.
जातीय समीकरण, भाषेचा मुद्दा, भूमिपुत्रांचा मुद्दा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अवतीभोवती मुंबईतील सहाही लोकसभा जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. या मतदारसंघात देखील मराठी – अमराठी किंवा बाहेरून आलेला उमेदवार अशा प्रकारचा प्रचार महाविकास आघाडीकडून केला गेला.
मात्र विरोधकांच्या प्रचाराच्या सर्व मुद्द्यांना मागे सारत भाजपचा गेल्या कित्येक वर्षांपासून बालेकिल्ला असलेला हा गड गोयल यांनी कायम राखला आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…