यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बनला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आश्चर्याचा धक्का


नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी निवडणूक आयोगाच्यावतीने मुख्य निवडणूक आयुक्त


राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या निवडणुकीत एक ‘जागतिक विक्रम’ झाल्याचे सांगितले. तसेच मतदान कसे पार पडले. तसेच सात टप्प्यातील मतदानाच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली.


इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या 'लापता जेंटलमैन वापस आ गए' मीम्सवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. आचारसंहिता काळात १० हजार कोटी रुपयांची कॅश, वस्तू जप्त करण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.


पत्रकार परिषदेत राजीव कुमार यांनी उभे राहून भारतातील मतदारांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी सांगितले की, आम्ही वयोवृद्धांकडून अर्थात ८५ वर्षांवरील मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करवून घेतले. भारतात ६४२ मिलियन अर्थात ६४ कोटी मतदार आहेत. मतदारांची ही संख्या जगातील २७ देशांतील मतदारांहून पाच पट जास्त आहे. इतक्या मोठ्या संख्येने देशात लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. आपण या निवडणुकीत जागतिक विक्रम केला आहे.


दरम्यान, सात टप्प्यातील मतदानाच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, या संपूर्ण निवडणूक कार्यक्रमासाठी १.५ कोटी मतदान आणि सुरक्षा रक्षकांसाठी १३५ विशेष रेल्वे गाड्या, ४ लाख वाहने आणि १६९२ फ्लाईट्सचा वापर केला गेला. यामध्ये ६८,७६३ मॉनिटरिंग टीम निवडणुकीवर लक्ष ठेऊन होत्या. या निवडणुकीत मोठ्या ब्रँडसह स्टार्टअपपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने योगदान दिले होते.


तसेच ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणुका झाल्याचेही आयोगाने मान्य केले. पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपविण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. यंदाची निवडणूक १ जूनपर्यंत लांबली होती. ४ जूनला मतमोजणी होणार आहे. आयोगाच्या नव्या घोषणेनुसार भविष्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात मतमोजणी होणार आहे. म्हणजेच मार्चमध्ये जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीमध्ये जाहीर केला जाणार आहे.


महिला मतदारांची संख्या महत्त्वाची होती. येत्या काळात तरुण या मतदानातून प्रेरणा घेतील. ३१ कोटींहून अधिक महिला मतदारांनी मतदान केले. मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत बळकट आहे. निवडणूक उत्साहात पार पडली आहे. आता आम्ही पारदर्शीपणे मतमोजणीला आणि निकालाच्या दिवसाला सामोरे जात आहोत. कुणाकडून काहीही चुकीचे करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही कुणाचीही गय करणार नाही. लोकशाहीची मूळे बळकट करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो, असे राजीव कुमार यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Sukhoi Su-30 MKI Crashes: Su-30MKI विमान अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद

दिल्ली: आसामच्या दाट जंगलात बेपत्ता झालेल्या त्या 'सुखोई-३०' विमानाबाबतची भीती अखेर खरी ठरली आहे. तासनतास सुरू

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींकडून पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि कार्यशैलीचे कौतुक केले

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

Iran Israel War : खामेनी यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; परराष्ट्र सचिव यांनी दिली इराणी दूतावासाला भेट

भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत

Sukhoi Su-30 MKI Crashes: भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; टेकऑफनंतर बेपत्ता, पायलटचे काय झाले?

मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने