Suicide news : मंत्रालयासमोरच्या इमारतीत आयएएस अधिकार्‍याच्या मुलीची आत्महत्या!

वकिलीचं घेत होती शिक्षण


मुंबई : मुंबईतून एक मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेले आयएएस अधिकारी विकास रस्तोगी (Vikas Rastogi) यांच्या मुलीने राहत्या घराच्या इमारतीतील १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याने (IAS officer daughter commits Suicide) खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना मंत्रालयासमोरच (Mantralaya) घडली. सरकारमधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे जीवन संपवून घेणं ही साधी गोष्ट नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. मंत्रालयासमोर सुनीती इमारत आहे. तिथे १० व्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात. त्यांची मुलगी २७ वर्षांची होती व ती एलएलबीचं (LLB) शिक्षण घेत होती. तिने रात्रीच्या सुमारास दहाव्या मजल्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं. उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली व तिचा जागीच मृत्यू झाला.


आत्महत्येमागे काय कारण आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्यातून काहीतरी माहिती समोर येऊ शकते. सध्या मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.


Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील