Crime news : पाणीकपातीमुळे आंघोळ न करण्याच्या सल्ल्यावरुन नवरा भडकला! बायकोवर केले चाकूने वार

Share

तर दुसरीकडे वाढदिवसाला केक उशिरा आणल्याने संतापलेल्या पतीने पत्नी व मुलावर केला चाकूहल्ला

साकीनाका येथील दोन अमानुष घटना

मुंबई : हल्ली कोणतीही गोष्ट मनासारखी घडली नाही की टोकाला जाण्याचे प्रकार इतके वाढले आहेत, की यातून थेट जीवघेणा हल्ला करण्याच्या घटना (Crime news) घडतात. अशाच दोन अमानुष घटना मुंबईच्या साकीनाका परिसरातून (Sakinaka) समोर आल्या आहेत. सध्या मुंबईत पाणीकपात (Water cut) सुरु असल्याने पत्नीने पतीला आंघोळ करु नका, या दिलेल्या सल्ल्यावर पती इतका भडकला की त्याने थेट पत्नीवर चाकूने वार केले. तर दुसर्‍या घटनेत केवळ वाढदविसाला केक उशिरा आणल्याने संतापलेल्या पतीने पत्नी व मुलावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनांमुळे राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्यामुळे तसेच मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याने पाच टक्के पाणी कपात करण्यात येत आहे. पाणीकपातीमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याच पाणीकपातीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी परमात्मा गुप्ता आणि त्याची पत्नी मीरा हे साकीनाका येथील टिळक नगर येथे राहतात. शनिवारी उन्हातून घरी आल्यानंतर घामाने भिजल्यामुळे परमात्मा गुप्ता यांनी आंघोळ करण्याचे ठरवले. पण पत्नीने त्यांना आंघोळ करण्यास मनाई केली. बीएमसीची पाणीकपात सुरू आहे आणि पाण्याची बचत केली पाहिजे, असा सल्ला तिने दिला. यामुळे परमात्मा आणि त्यांच्या पत्नीमध्ये बाचाबाची झाली.

हा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने चाकूने पत्नीवर हल्ला केला. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. साकीनाका पोलीस ठाण्याच्या पथकाने परमात्माला त्याच्या राहत्या घरातून उचलून हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

वाढदिवसाला केक उशिरा आणल्याच्या रागातून केला हल्ला

तर दुसरीकडे वाढदिवसाला केक उशिरा आणल्याच्या रागातून पतीने चाकूने पत्नी व मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्यात आरोपीची पत्नी रंजना शिंदे व सुनिल शिंदे हे जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पत्नी रंजना शिंदेंनी दिलेल्या तक्रारीनुसार साकीनाका पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र शिंदेवर भादवी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी राजेंद्र यांचा वाढदिवस असल्याने पत्नी व मुलाने केक आणण्यास उशीर केल्यावरून राजेंद्र व रंजना यांच्याच वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झालेले राजेंद्र पत्नीच्या अंगावर मारण्यासाठी धावून जात होते. त्यावेळी सुनिलने त्यांना अडवले. पाहता पाहता राजेंद्र यांनी घरातील भाजी कापायच्या चाकूने मुलाच्या पोटावर खांद्यावर तर रंजना यांच्या मनगटावर वार करत त्यांना जखमी केले. क्षुल्लक कारणांवरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची साकीनाक्यातील ही दुसरी घटना आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

40 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

2 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago