WI vs PNG:रॉस्टन चेजच्या वादळामुळे वाचली वेस्ट इंडिज, मिळवला ५ विकेटनी विजय

Share

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पापुआ न्यू गिनीला ५ विकेटनी हरवले. शेवटच्या ओव्हर्समध्ये आंद्रे रसेल आणि रॉस्टन चेजने आपल्या संघाला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला.

पापुआ न्यू गिनीने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत १३६ धावा केल्या होत्या. यात सेसे बाऊच्या ४३ बॉलमध्ये ५० धावांच्या खेळीचा समावेश होता. किप्लिन डोरिगाने शेवटच्या ओव्हर्समध्ये १८ बॉलमध्ये २७ धावांची खेळी केली.

खरंतर हे आव्हान वेस्ट इंडिज संघासाठी तितके मोठे नव्हते. मात्र त्यांच्यासाठी पहिली १५ षटके अधिक संघर्षपूर्ण राहिली. मात्र १८व्या षटकांत १८ धावांनी सामन्याचे चित्रच बदलले. पापुआ न्यू गिनीसाठी कर्णधार असदवालाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

१३७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्याच षटांत जॉनसन चार्ल्सची विकेट गमावली. तो आपल्या पदार्पणाच्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार ठरला. दुसऱ्या ओव्हरमध्ये निकोलस पूरन बचावला. पूरनने २७ बॉलमध्ये २७ धावा केल्या. मात्र मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो बाद झाला. काही वेळानंतर पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असदवालाने ब्रँडन किंगला ३४ धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार रोवमन पॉवेल क्रीझवर आला, मात्र तोही मोठा शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला. पावेलने १५ धावा केल्या. १५ षटकांत वेस्ट इंडिजने ४ विकेट गमावत ९४ धावा केल्या होत्या. शेवटच्या पाच षटकांत ४३ धावा हव्या होत्या. त्याचवेळी शेरफान रदरफोर्ड २ धावा करून बाद झाला.

संघाला शेवटच्या ३ षटकांत ३१ धावांची गरज होती. मात्र १८व्या षटकांत १८ धावा काढत वेस्ट इंडिजने आपला विजय सुरक्षित केला.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago