WI vs PNG:रॉस्टन चेजच्या वादळामुळे वाचली वेस्ट इंडिज, मिळवला ५ विकेटनी विजय

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पापुआ न्यू गिनीला ५ विकेटनी हरवले. शेवटच्या ओव्हर्समध्ये आंद्रे रसेल आणि रॉस्टन चेजने आपल्या संघाला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला.


पापुआ न्यू गिनीने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत १३६ धावा केल्या होत्या. यात सेसे बाऊच्या ४३ बॉलमध्ये ५० धावांच्या खेळीचा समावेश होता. किप्लिन डोरिगाने शेवटच्या ओव्हर्समध्ये १८ बॉलमध्ये २७ धावांची खेळी केली.


खरंतर हे आव्हान वेस्ट इंडिज संघासाठी तितके मोठे नव्हते. मात्र त्यांच्यासाठी पहिली १५ षटके अधिक संघर्षपूर्ण राहिली. मात्र १८व्या षटकांत १८ धावांनी सामन्याचे चित्रच बदलले. पापुआ न्यू गिनीसाठी कर्णधार असदवालाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.


१३७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्याच षटांत जॉनसन चार्ल्सची विकेट गमावली. तो आपल्या पदार्पणाच्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार ठरला. दुसऱ्या ओव्हरमध्ये निकोलस पूरन बचावला. पूरनने २७ बॉलमध्ये २७ धावा केल्या. मात्र मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो बाद झाला. काही वेळानंतर पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असदवालाने ब्रँडन किंगला ३४ धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार रोवमन पॉवेल क्रीझवर आला, मात्र तोही मोठा शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला. पावेलने १५ धावा केल्या. १५ षटकांत वेस्ट इंडिजने ४ विकेट गमावत ९४ धावा केल्या होत्या. शेवटच्या पाच षटकांत ४३ धावा हव्या होत्या. त्याचवेळी शेरफान रदरफोर्ड २ धावा करून बाद झाला.


संघाला शेवटच्या ३ षटकांत ३१ धावांची गरज होती. मात्र १८व्या षटकांत १८ धावा काढत वेस्ट इंडिजने आपला विजय सुरक्षित केला.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण