Railway Megablock : प्रवाशांना दिलासा! ६३ तासांचा मेगाब्लॉक संपणार, पण...

मध्य रेल्वेने दिली मोठी माहिती


मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) स्थानकावरील फलाट विस्तारीकरणासाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक (Megablock) घेतला होता. या ब्लॉकदरम्यान रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेली सर्व कामे आटोपून रेल्वे लोकल सेवा लवकर सुरळीत करावी, अशी प्रवाशांनी मागणी केली होती. त्यामुळे मध्य रेल्वेने वेळेआधीच कामे पूर्ण करण्याचा मानस साधला होता. अशातच आज दुपारी हा मेगाब्लॉक संपणार असून रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र ब्लॉक संपूनही काही रेल्वे रद्द केल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. त्यामुळे आजही गरज असल्यास प्रवाशांनी बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेकडून ठाण्यात ६३ तास आणि सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान अनेक लोकल ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांचे हाल पाहता प्रशासनाने देखील ब्लॉककाळात नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. सीएसएमटी आणि ठाणे स्टेशनवरील सुरू असलेली कामे जवळपास पूर्ण होत आली आहे.


सीएसएमटी येथील ३६ तासांचा ब्लॉक आज रविवारी दुपारी १२.३० वाजता तर ठाणे येथील ६३ तासांचा ब्लॉक आज दुपारी ३.३० वाजता संपणार आहे. मात्र, सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे लोकल भायखळा, परळ, दादर आणि वडाळ्यापर्यंत धावणार असल्याने आजही मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली आहे.



इतक्या रेल्वेगाड्या रद्द


आज लोकल ट्रेनच्या २३५ फेऱ्या आणि २७० लोकल अंशत: रद्द असतील. त्याचप्रमाणे ३१ रेल्वेगाड्या रद्द आणि ८० रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व