'आंबेडकरांचा फोटो फाडणा-या आव्हाडांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल'

पालकमंत्री हसन मुश्रीफांची सडकून टीका


कागल : ‘आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडून त्यांचा अपमान केला आहे. यामुळे संपूर्ण देशवासीयांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावलेल्या आहेत. आव्हाड यांनी कितीही माफी मागितली तरी त्यांचे हे कृत्य पुसले जाणार नाही. त्यांना प्रायश्चित्त (atonement) घ्यावेच लागेल’, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


तसेच आमचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आव्हाडांची पाठराखण करायच्या नादात डॉ. आंबेडकर यांचा अपमानच विसरले. भुजबळ यांनी आव्हाडांना खडे बोल सुनावले पाहिजे होते. त्यांचे हे कृत्य अत्यंत चुकीचे आहे, असे ठणकावून सांगण्याची गरज होती, अशी अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली.


ते पुढे म्हणाले की, ‘गेल्या आठवड्यातच मुंबईत पक्षाच्या बैठकीत अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे धडे येत असल्याचा उल्लेख करीत भुजबळ यांनी हा विषय काढला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की, ‘अभ्यासात येऊ घातलेल्या मनुस्मृतीच्या धड्याला आपला कडाडून विरोधच असेल.’ या पार्श्वभूमीवर निव्वळ राजकारण करायचे म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये चवदार तळ्यावर हा विकृत प्रकार केला. अशा स्टंटबाजी करणा-यांना रोखायलाच हवे, त्यांचा या कृत्याला माफी नाही, त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल, असेही मुश्रीफ म्हणाले.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली