Water Shortage : पुणेकरांवर जलसंकट! १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

मराठवाड्यात ८.९२ टक्के तर खडकवासला धरणात ५ टीएमसी पाणी शिल्लक


पुणे : यंदा मुंबईकरांसह पुणेकरांना (Mumbai-Pune) देखील उन्हाच्या तीव्र झळांसोबत भीषण पाणी टंचाईच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात एकूण २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे मुंबई पुणे यासह अनेक जिल्ह्यांसमोर जलसंकट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्याचे प्रमाण ९ टक्क्यांनी कमी झाल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असण्यासोबतच भीषण पाणी टंचाईचा देखील ठरत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या खडकवासला (Khadakwasla) धरणात केवळ ५ टीएमसी पाणी शिल्लक राहिला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात सर्वात कमी ८.९२ टक्के पाणीसाठा उरला असल्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.



पुण्यात केवळ ५.३२ टीएमसी पाणीसाठा


पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ५.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे प्रमाण अवघे १८.२५ टक्के इतके आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पानशेत वरसगाव टेमघर या धरणक्षेत्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तर खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षी आजच्या तारखेला ७ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षी आणि या वर्षीच्या आजच्या तारखेच्या टक्केवारीची तुलना केल्यास पाणी साठा कमी आहे.



महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा


जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणेकरांना जेमतेम महिनाभर हा पाणीसाठा पुरू शकणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत पाऊस न पडल्यास पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय शिल्लक पाण्यातून पुणे शहर, दौंड शहराला पाणी पुरवठा करण्याचा जलसंपदा विभागाने प्रस्ताव मांडला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली