T-20 world cup 2024: वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी झोप मोडावी लागेल? पाहा किती वाजता असणार सामने

मुंबई: टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेची सुरूवात १ जूनपासून होत आहे. भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एक वॉर्मअप सामना खेळणार आहे.


भारत आणि अमेरिका यांच्यातील वेळेत ९ तास ३० मिनिटांचा फरक आहे. वेस्ट इंडिजमध्येही हेच आहे. भारतीय संघ आपले चारही लीग सामने अमेरिकेत खेळणार आहे. त्यामुळे लोकांना ही उत्सुकता आहे की भारतीयांना वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी आपली झोप खराब करावी लागेल का? किती वाजता वर्ल्डकपचे सामने सुरू होणार.


टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये एकूण ५५ सामने खेळवले जातील. स्पर्धेचा पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला जाईल. फायनलचा सामना २९ जूनला बारबाडोस येथील ब्रिजटाऊनच्या केनसिंग्टन ओव्हलमध्ये खेळवला जाईल. २० संघांना ४ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.


चारही ग्रुपमधील अव्वल दोन संघ सुपर ८साठी क्वालिफाय करतील. यानंतर पॉईंट्स टेबलमधील चौथ्या स्थानावरील संघ पहिल्या स्थानाच्या संघासोबत सेमीफायनलमध्ये लढेल. तर दुसऱ्या स्थानावरील संघ तिसऱ्या स्थानाच्या संघाशी लढेल. या दोन्ही सेमीफायनलमधील विजेते संघ फायनलमध्ये भिडतील.


भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील आपले चारही सामने अमेरिकेत खेळत आहे. टीम इंडिया लीग स्टेजमध्ये चार सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळणार आहे. वर्ल्डकपचे इतर सामने सकाळी ६ वाजता, रात्री ९ वाजता, सकाळी ५ वाजल्यापासून, रात्री उशिरा साडेबारा वाजता, रात्री १० वाजल्यापासून आणि रात्री १०.३० वाजल्यापासून खेळवले जातील.

Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा