T-20 world cup 2024: वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी झोप मोडावी लागेल? पाहा किती वाजता असणार सामने

Share

मुंबई: टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेची सुरूवात १ जूनपासून होत आहे. भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एक वॉर्मअप सामना खेळणार आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील वेळेत ९ तास ३० मिनिटांचा फरक आहे. वेस्ट इंडिजमध्येही हेच आहे. भारतीय संघ आपले चारही लीग सामने अमेरिकेत खेळणार आहे. त्यामुळे लोकांना ही उत्सुकता आहे की भारतीयांना वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी आपली झोप खराब करावी लागेल का? किती वाजता वर्ल्डकपचे सामने सुरू होणार.

टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये एकूण ५५ सामने खेळवले जातील. स्पर्धेचा पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला जाईल. फायनलचा सामना २९ जूनला बारबाडोस येथील ब्रिजटाऊनच्या केनसिंग्टन ओव्हलमध्ये खेळवला जाईल. २० संघांना ४ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.

चारही ग्रुपमधील अव्वल दोन संघ सुपर ८साठी क्वालिफाय करतील. यानंतर पॉईंट्स टेबलमधील चौथ्या स्थानावरील संघ पहिल्या स्थानाच्या संघासोबत सेमीफायनलमध्ये लढेल. तर दुसऱ्या स्थानावरील संघ तिसऱ्या स्थानाच्या संघाशी लढेल. या दोन्ही सेमीफायनलमधील विजेते संघ फायनलमध्ये भिडतील.

भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील आपले चारही सामने अमेरिकेत खेळत आहे. टीम इंडिया लीग स्टेजमध्ये चार सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळणार आहे. वर्ल्डकपचे इतर सामने सकाळी ६ वाजता, रात्री ९ वाजता, सकाळी ५ वाजल्यापासून, रात्री उशिरा साडेबारा वाजता, रात्री १० वाजल्यापासून आणि रात्री १०.३० वाजल्यापासून खेळवले जातील.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

23 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

51 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago