T-20 world cup 2024: वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी झोप मोडावी लागेल? पाहा किती वाजता असणार सामने

मुंबई: टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेची सुरूवात १ जूनपासून होत आहे. भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एक वॉर्मअप सामना खेळणार आहे.


भारत आणि अमेरिका यांच्यातील वेळेत ९ तास ३० मिनिटांचा फरक आहे. वेस्ट इंडिजमध्येही हेच आहे. भारतीय संघ आपले चारही लीग सामने अमेरिकेत खेळणार आहे. त्यामुळे लोकांना ही उत्सुकता आहे की भारतीयांना वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी आपली झोप खराब करावी लागेल का? किती वाजता वर्ल्डकपचे सामने सुरू होणार.


टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये एकूण ५५ सामने खेळवले जातील. स्पर्धेचा पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला जाईल. फायनलचा सामना २९ जूनला बारबाडोस येथील ब्रिजटाऊनच्या केनसिंग्टन ओव्हलमध्ये खेळवला जाईल. २० संघांना ४ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.


चारही ग्रुपमधील अव्वल दोन संघ सुपर ८साठी क्वालिफाय करतील. यानंतर पॉईंट्स टेबलमधील चौथ्या स्थानावरील संघ पहिल्या स्थानाच्या संघासोबत सेमीफायनलमध्ये लढेल. तर दुसऱ्या स्थानावरील संघ तिसऱ्या स्थानाच्या संघाशी लढेल. या दोन्ही सेमीफायनलमधील विजेते संघ फायनलमध्ये भिडतील.


भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील आपले चारही सामने अमेरिकेत खेळत आहे. टीम इंडिया लीग स्टेजमध्ये चार सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळणार आहे. वर्ल्डकपचे इतर सामने सकाळी ६ वाजता, रात्री ९ वाजता, सकाळी ५ वाजल्यापासून, रात्री उशिरा साडेबारा वाजता, रात्री १० वाजल्यापासून आणि रात्री १०.३० वाजल्यापासून खेळवले जातील.

Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव