दिल्लीत पारा ५२.३ अंशावर! तापमानाने १०० वर्षाचा विक्रम मोडला!

नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये सूर्य आग ओकतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिल्लीमध्ये भीषण उष्णतेची लाट आली आहे. दिल्ली येथे ५० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असून, तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. दिल्लीमध्ये तापमानाने १०० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. दिल्लीत ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


हवामान विभागाने आज दिल्लीसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला होता. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात रेकॉर्ड ब्रेक गरमी पाहायला मिळत आहे. आज बुधवारी राजधानी दिल्लीतीन मुंगेशपूर भागात सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


दिल्लीला मान्सून दाखल होईपर्यंत संपूर्ण जून महिना निघून जाईल. त्यामुळे जून हा महिना दिल्लीकरांना आणखी रडवणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.


दरम्यान, उत्तर भारतात जणू आकाशातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत, अशी गरमी जाणवत आहे. राजस्थानच्या चुरूमध्येही पारा ५० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. झांशी, यूपीमध्ये दिवसाचे तापमान ४९ अंश होते. आग्रामध्ये पारा ४८.६ अंशांवर आणि वाराणसीमध्ये ४७.६ अंश सेल्सिअस तापमान होते.

Comments
Add Comment

Carbide Gun Causes : खेळणं की 'घातक शस्त्र'? दिवाळीचा आनंद अंधारात! १५० रुपयांच्या कार्बाइड गनने १४ चिमुकल्यांची दृष्टी हिरावली

जबलपूर : यावर्षी अनेक घरांसाठी दिवाळीचा सण आनंद नव्हे, तर दुःख आणि मोठी चिंता घेऊन आला आहे. याचे कारण म्हणजे

बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण बस अपघात, २० जणांचा मृत्यू; जयंत कुशवाहाचा थरकाप उडवणारा अनुभव

हैदराबाद : बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बसने

देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगवर बंदी येणार ?

नवी दिल्ली: देशात वाढत्या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय