उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. या विमानात ३५५ प्रवासी प्रवास करत होते. उजव्या बाजूचं इंजिन बंद पडल्याने वैमानिकाने तातडीने विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवलं.


एअर इंडियाचं AI887 हे विमान आज सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालं होतं. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या इंजिनमधील ऑईल प्रेशर शून्यावर आल्याचं वैमानिकाच्या निदर्शनास आलं. ही बाब लक्षात येताच वैमानिकांनी हवेतच यू-टर्न घेतला आणि ६ वाजून ५२ मिनिटांनी विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवलं.


ऑईल प्रेशर कमी होणं ही विमानासाठी गंभीर तांत्रिक अडचण मानली जाते. या स्थितीत इंजिनच्या काही भागांपर्यंत तेल पोहोचत नाही, ज्यामुळे इंजिन गरम होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत उड्डाण सुरू ठेवल्यास इंजिन पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता असते. मात्र विमानातील दुसरं इंजिन कार्यरत असल्यास वैमानिक सुरक्षित लँडिंग करू शकतात, म्हणूनच तत्काळ लँडिंगचा निर्णय घेण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.


दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात