LIC : सरकारी खजिन्यात पडणार 'इतक्या' कोटींची भर; एलआयसी देणार घसघशीत लाभांश

मुंबई : काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सरकारला तब्बल २.११ लाख कोट्यावधी रुपयांचा घसघशीत लाभांश दिला होता. त्यामुळे सरकारची पेटी चांगलीच भरली होती. त्यानंतर आता सरकारची पेटी आणखी भरण्याची माहिती मिळत आहे. आरबीआयनंतर आणखी एका संस्था कडून सरकारला तब्बल कोट्यावधी रुपयांचा लाभ मिळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी (LIC) ही देशातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक विश्वासार्ह अशी जीवन विमा कंपनी आहे. देशातील कोट्यवधी लोक आपला विमा या संस्थेच्या माध्यमातून काढतात. ही संस्था सरकारी असल्यामुळे लोकांना त्यांचे पैसे बुडण्याचा धोका नसतो. म्हणून ही संस्था गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, या संस्थेच्या चौथ्या तिमाहिचा नुकताच निकाल समोर आला आहे. निकालानुसार, चांगली कामगिरी केल्यामुळे या संस्थेला कोट्यावधी रुपयांचा नफा झालेला आहे. त्यामुळे या लाभांशाचा भारत सरकारला चांगलाच फायदा होणार आहे.



तब्बल ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार 


चौथ्या तिमाहीत एलआयसीच्या नफ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून तब्बल १३ हजार ७६३ कोटींचा नफा झाला आहे. त्यामुळे ही संस्था आता केंद्र सरकारला ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे. सरकारची यामध्ये साधारण ९६.५ टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे या कंपनीने सरकारला प्रतिसमभाग सहा रुपयांच्या दराने लाभांश देण्याची घोषणा केली आहे.


दरम्यान, एलआयसी आणि आरबीआय या दोन्ही संस्थांकडून मिळणाऱ्या लाभांशामुळे सरकारच्या तिजोरीत लाखो कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. या पैशांच्या मदतीने सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव