LIC : सरकारी खजिन्यात पडणार 'इतक्या' कोटींची भर; एलआयसी देणार घसघशीत लाभांश

मुंबई : काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सरकारला तब्बल २.११ लाख कोट्यावधी रुपयांचा घसघशीत लाभांश दिला होता. त्यामुळे सरकारची पेटी चांगलीच भरली होती. त्यानंतर आता सरकारची पेटी आणखी भरण्याची माहिती मिळत आहे. आरबीआयनंतर आणखी एका संस्था कडून सरकारला तब्बल कोट्यावधी रुपयांचा लाभ मिळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी (LIC) ही देशातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक विश्वासार्ह अशी जीवन विमा कंपनी आहे. देशातील कोट्यवधी लोक आपला विमा या संस्थेच्या माध्यमातून काढतात. ही संस्था सरकारी असल्यामुळे लोकांना त्यांचे पैसे बुडण्याचा धोका नसतो. म्हणून ही संस्था गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, या संस्थेच्या चौथ्या तिमाहिचा नुकताच निकाल समोर आला आहे. निकालानुसार, चांगली कामगिरी केल्यामुळे या संस्थेला कोट्यावधी रुपयांचा नफा झालेला आहे. त्यामुळे या लाभांशाचा भारत सरकारला चांगलाच फायदा होणार आहे.



तब्बल ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार 


चौथ्या तिमाहीत एलआयसीच्या नफ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून तब्बल १३ हजार ७६३ कोटींचा नफा झाला आहे. त्यामुळे ही संस्था आता केंद्र सरकारला ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे. सरकारची यामध्ये साधारण ९६.५ टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे या कंपनीने सरकारला प्रतिसमभाग सहा रुपयांच्या दराने लाभांश देण्याची घोषणा केली आहे.


दरम्यान, एलआयसी आणि आरबीआय या दोन्ही संस्थांकडून मिळणाऱ्या लाभांशामुळे सरकारच्या तिजोरीत लाखो कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. या पैशांच्या मदतीने सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच