LIC : सरकारी खजिन्यात पडणार 'इतक्या' कोटींची भर; एलआयसी देणार घसघशीत लाभांश

मुंबई : काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सरकारला तब्बल २.११ लाख कोट्यावधी रुपयांचा घसघशीत लाभांश दिला होता. त्यामुळे सरकारची पेटी चांगलीच भरली होती. त्यानंतर आता सरकारची पेटी आणखी भरण्याची माहिती मिळत आहे. आरबीआयनंतर आणखी एका संस्था कडून सरकारला तब्बल कोट्यावधी रुपयांचा लाभ मिळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी (LIC) ही देशातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक विश्वासार्ह अशी जीवन विमा कंपनी आहे. देशातील कोट्यवधी लोक आपला विमा या संस्थेच्या माध्यमातून काढतात. ही संस्था सरकारी असल्यामुळे लोकांना त्यांचे पैसे बुडण्याचा धोका नसतो. म्हणून ही संस्था गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, या संस्थेच्या चौथ्या तिमाहिचा नुकताच निकाल समोर आला आहे. निकालानुसार, चांगली कामगिरी केल्यामुळे या संस्थेला कोट्यावधी रुपयांचा नफा झालेला आहे. त्यामुळे या लाभांशाचा भारत सरकारला चांगलाच फायदा होणार आहे.



तब्बल ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार 


चौथ्या तिमाहीत एलआयसीच्या नफ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून तब्बल १३ हजार ७६३ कोटींचा नफा झाला आहे. त्यामुळे ही संस्था आता केंद्र सरकारला ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे. सरकारची यामध्ये साधारण ९६.५ टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे या कंपनीने सरकारला प्रतिसमभाग सहा रुपयांच्या दराने लाभांश देण्याची घोषणा केली आहे.


दरम्यान, एलआयसी आणि आरबीआय या दोन्ही संस्थांकडून मिळणाऱ्या लाभांशामुळे सरकारच्या तिजोरीत लाखो कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. या पैशांच्या मदतीने सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात