LIC : सरकारी खजिन्यात पडणार 'इतक्या' कोटींची भर; एलआयसी देणार घसघशीत लाभांश

मुंबई : काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सरकारला तब्बल २.११ लाख कोट्यावधी रुपयांचा घसघशीत लाभांश दिला होता. त्यामुळे सरकारची पेटी चांगलीच भरली होती. त्यानंतर आता सरकारची पेटी आणखी भरण्याची माहिती मिळत आहे. आरबीआयनंतर आणखी एका संस्था कडून सरकारला तब्बल कोट्यावधी रुपयांचा लाभ मिळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी (LIC) ही देशातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक विश्वासार्ह अशी जीवन विमा कंपनी आहे. देशातील कोट्यवधी लोक आपला विमा या संस्थेच्या माध्यमातून काढतात. ही संस्था सरकारी असल्यामुळे लोकांना त्यांचे पैसे बुडण्याचा धोका नसतो. म्हणून ही संस्था गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, या संस्थेच्या चौथ्या तिमाहिचा नुकताच निकाल समोर आला आहे. निकालानुसार, चांगली कामगिरी केल्यामुळे या संस्थेला कोट्यावधी रुपयांचा नफा झालेला आहे. त्यामुळे या लाभांशाचा भारत सरकारला चांगलाच फायदा होणार आहे.



तब्बल ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार 


चौथ्या तिमाहीत एलआयसीच्या नफ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून तब्बल १३ हजार ७६३ कोटींचा नफा झाला आहे. त्यामुळे ही संस्था आता केंद्र सरकारला ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे. सरकारची यामध्ये साधारण ९६.५ टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे या कंपनीने सरकारला प्रतिसमभाग सहा रुपयांच्या दराने लाभांश देण्याची घोषणा केली आहे.


दरम्यान, एलआयसी आणि आरबीआय या दोन्ही संस्थांकडून मिळणाऱ्या लाभांशामुळे सरकारच्या तिजोरीत लाखो कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. या पैशांच्या मदतीने सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे