Mizoram News : मिझोरममध्ये चक्रीवादळाचा विध्वंस अन् पावसाचा कहर!

दगडाची खाण कोसळल्याने १० जणांचा मृत्यू; अनेक घरं जमीनदोस्त


मिझोरम : बंगालच्या उपसागरात तयार झालेलं रेमल चक्रीवादळ (Remal Cyclone) पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकल्यामुळे अनेक ठिकाणी चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला. त्यासोबत राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) कहर देखील पाहायला मिळला आहे. काही ठिकाणी वीज पडून लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या शेतीचं व घराचं नुकसान झालं आहे. अशातच फक्त राज्यातच नाही तर मिझोरममध्ये (Mizoram) देखील आता वादळी पावसाचं थैमान दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळामुळे मिझोरमची राजधानी आयझॉल येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी सहाच्या सुमारास आयझॉलच्या मेल्थम सीमेवर दगडाची खाण कोसळली (Stone Mine Collapsed). खाण कोसळल्यामुळे दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती मिळत आहे.



पावसामुळे बचावकार्यात अडथळा


मिझोरम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, मात्र अनेक जण अजूनही अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यावर परिणाम होत असला तरीही बचावकार्य सतत सुरु राहील, असे डीजीपी अनिल शुक्ला यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भारताच्या मुलीची ऐतिहासिक कामगिरी! तिरंदाजी स्पर्धेत भारतीय एबल-बॉडी ज्युनियर संघात निवड

मुंबई: देणाऱ्याने देताना काहीतरी विचार केलाच असेल, असं आपण नेहमीच म्हणतो. मग ते सुख असो किंवा दु:ख... आणि याचा अनुभव

आयसिसच्या तीन अतिरेक्यांना अटक, गुजरात ATS ची धडक कारवाई

अहमदाबाद : गुजरात एटीएसने 'आयसिस'शी संबंधित तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी देशात मोठा घातपात करण्याची

'हे' आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण

‘त्यांच्याकडून मुलांना पिस्तुल, तर आमच्याकडून लॅपटॉप’

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय