Dharavi Fire : धारावीत अग्नितांडव! भीषण आगीत ६ जण जखमी

आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट


मुंबई : मुंबईतील धारावी (Dharavi) येथे पहाटेच्या सुमारास एका गोदामाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीत ६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील अशोक मिल कंपाउंड रोडवरील कला किला येथे ही आगीची घटना घडली आहे. या परिसरातील कमर्शियल गारमेंट, जिमला पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली. ही आग जमिनीपासून गोदामाच्या वरील तीन मजल्यांपर्यंत पोहोचली होती. या घटनेत इमारतीमधील लाकडी साहित्य आणि फर्निचर जळाल्याची माहिती मिळत आहे.


घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच दहा अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाकडून सर्व बाजूंनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु या आगीत सहा जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. जखमींना आगीतून बाहेर काढून उपचारासाठी सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलं आहेत. दरम्यान, सध्या आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे. मात्र आग लागण्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसल्याचं अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष सावंत यांनी सांगितले.



जखमींची माहिती


आगीत जखमी झालेले सलमान खान (२६) अणि मनोज (२६) ८ ते १० टक्के भाजले आहेत. सैदुल रहमान (२६) हे ३५ ते ४० टक्के भाजले आहेत. तर रफिक अहमद (२६), सल्लाउद्दीन(४०) व सैदुल रहमान (२६) हे ४० ते ५० टक्के भाजले आहेत. दरम्यान, जखमींवर उपचार सुरु असून सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे