Pune Accident : पोर्शेनंतर पुण्यात आणखी एक भयंकर अपघात! ट्रकने दुचाकीला फरफटत नेलं आणि...

  65

दोन महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू


पुणे : पुण्यात (Pune) एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने सध्या खळबळ उडवून दिली आहे. हा मुलगा धनिकपुत्र असल्याने त्याला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशा प्रकारे कामाला लागली आहे, याचे रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत असतानाच आता आणखी एक अपघाताची घटना पुण्यातून (Pune Accident) समोर आली आहे. एका भरधाव ट्रकने एका दुचाकीला फरफटत नेल्याने दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे.


मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येत होता यावेळी खराडीतील जकात नाका चौकात हा अपघात घडला. काल रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. त्यात दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला. हे दोन महाविद्यालयीन युवक मूळचे लातूरचे असून ते सध्या वाघोली येथे शिक्षण घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. श्यामबाबू रामफळ गौतम असे चालकाचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हा त्याचा ट्रक (MH 12 VF 6441) घेऊन चंदन नगरच्या दिशेने जात होता. जकात नाका येथे सिग्नलवर थांबलेल्या मोटरसायकला त्याने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये मोटरसायकल वरील असणारे ३ जण फरफटत गेले. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी आहे.


आदिल शेख असे एका तरुणाचे नाव असून इतर दोघांचे नाव समजू शकलेले नाही. घटनास्थळावरून ट्रक चालक याला ताब्यात घेऊन त्याला ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली