देशातील उष्णतेची लाट ओसरणार : महापात्रा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात उष्णतेची लाट सुरू आहे. लोक उष्णतेमुळे हैरान झाले होते. परंतु येत्या ३ दिवसात देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट ओसरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.


आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी ‘नैऋत्य मान्सून, २०२४ च्या पल्ल्याचा दुसरा टप्पा’ या विषयावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट पुढील तीन दिवसानंतर हळूहळू कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वायव्य भारत आणि देशाच्या मध्यभागी उष्णतेच्या लाटेपासून तीन दिवसांनंतर आराम मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि वायव्य भारतातील बहुतांशी राज्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत.


दरम्यान पुढील तीन दिवसांनंतर दिल्ली, राजस्थान, हरियाणा या वायव्य आणि मध्य भागांमध्ये उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार आहे. गुरुवारपासून (दि.३० मे) उष्णतेची लाट कमी होण्यास सुरुवात होईल, असेही आयएमडी प्रमुख मृत्युंजय मोहापात्रा यांनी म्हटले आहे.


यंदा संपूर्ण देशात पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दि.२७ मे रोजी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर ईशान्य प्रदेशात मंगळवार २८ मे पर्यंत अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असे देखील भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स