पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या कारणामुळे पतीवर फौजदारी कारवाई केली जाऊ शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका सुनावणी दरम्यान नोंदवले.


पत्नीने तिच्या पतीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, भारतीय समाजात हे वास्तव असू शकते जिथे पुरुष अनेकदा घराच्या आर्थिक बाबींवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु या कारणावरून फौजदारी खटला भरता येणार नाही.


न्या. बी.व्ही. नागरथना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने स्पष्ट केले की, वैवाहिक तक्रारी हाताळताना न्यायालयांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे आणि व्यावहारिक वास्तवांचा विचार केला पाहिजे. अनेकदा अशा तक्रारी लग्नानंतरच्या दैनंदिन जीवनातील किरकोळ वादांतून उद्भवतात, ज्यांना कोणत्याही प्रकारे क्रूरता म्हणता येणार नाही.


खंडपीठाने पुढे म्हटले की, पतीने आपल्या पत्नीला सर्व खर्चाची एक्सेल शीट तयार करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे, मात्र जरी तो खरा मानला तरी, क्रूरतेच्या व्याख्येत येत नाही. कोणतेही मानसिक किंवा शारीरिक नुकसान झालेले नसताना फक्त पतीचे आर्थिक वर्चस्व क्रूरता म्हणता येणार नाही. ही परिस्थिती भारतीय समाजात एक वास्तव आहे, जिथे घरातील पुरुष अनेकदा महिलांच्या आर्थिक स्थितीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु फौजदारी खटल्याचा वापर हा सूड उगवण्यासाठी केला जाऊ शकत नाही.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला