T20 World Cup 2024: हे ५ खेळाडू टीम इंडियाला बनवू शकतात टी-२० चॅम्पियन

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ अतिशय जवळ आला आहे. स्पर्धेची सुरुवात होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. याआधी २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये बाहेर पडावे लागले होते. अशातच पाच खेळाडू असे आहेत जे यावेळेस टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देऊ शकतात.



विराट कोहली


जूनपासून खेळवल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये २०२४मध्ये विराट कोहली भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. याआधी २०२२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.



रोहित शर्मा


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. रोहित शर्मा सलामीवीराची भूमिका अतिशय चोख निभावतो. २०२३मध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा चांगली सुरूवात करतात.



जसप्रीत बुमराह


बुमराह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज असेल. शानदार बॉलिंगमुळे तो टीम इंडियाला खिताब जिंकून देऊ शकतो.



सूर्यकुमार यादव


टी-२० आंतरराष्ट्रीयमधील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव काही बॉलमध्येच गेम बदलण्याची ताकद ठेवतो. सूर्या जर चांगला फॉर्म दाखवत असेल तर टीम इंडियाला मोठा फायदा पोहोचू शकतो. २०२२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सूर्याने २३९ धावा केल्या होत्या.



कुलदीप यादव


कुलदीप यादवची फिरकी टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. कुलदीप मुख्य स्पिनर म्हणून खेळणार. कुलदीपचा चांगला फॉर्म टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्यात फायदेशीर ठरू शकतो.

Comments
Add Comment

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला

समुद्रकिनारी रोमान्स : हार्दिक आणि माहिकाची प्रेमकहाणी उलगडली!

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या

IND vs AUS : स्मृती-प्रतिकाच्या शानदार अर्धशतकांमुळे भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे विशाल लक्ष्य!

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर

भारताविरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर विंडीज ९७ धावांनी पिछाडीवर

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना

टी-२०मधील सर्वात धक्कादायक निकाल, दुबळ्या नामिबियाने बलाढ्य द. आफ्रिकेला हरवले

विंडहोक : क्रिकेट जगतात नामिबियाने एक मोठा उलटफेर केला आहे. नामिबियाने त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळल्या

IND(W) vs AUS(W): आज भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कोणाचे पारडे आहे जड? घ्या जाणून

मुंबई: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आज १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाची लढत ऑस्ट्रेलियासोबत होत