T20 World Cup 2024: हे ५ खेळाडू टीम इंडियाला बनवू शकतात टी-२० चॅम्पियन

Share

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ अतिशय जवळ आला आहे. स्पर्धेची सुरुवात होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. याआधी २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये बाहेर पडावे लागले होते. अशातच पाच खेळाडू असे आहेत जे यावेळेस टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देऊ शकतात.

विराट कोहली

जूनपासून खेळवल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये २०२४मध्ये विराट कोहली भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. याआधी २०२२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. रोहित शर्मा सलामीवीराची भूमिका अतिशय चोख निभावतो. २०२३मध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा चांगली सुरूवात करतात.

जसप्रीत बुमराह

बुमराह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज असेल. शानदार बॉलिंगमुळे तो टीम इंडियाला खिताब जिंकून देऊ शकतो.

सूर्यकुमार यादव

टी-२० आंतरराष्ट्रीयमधील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव काही बॉलमध्येच गेम बदलण्याची ताकद ठेवतो. सूर्या जर चांगला फॉर्म दाखवत असेल तर टीम इंडियाला मोठा फायदा पोहोचू शकतो. २०२२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सूर्याने २३९ धावा केल्या होत्या.

कुलदीप यादव

कुलदीप यादवची फिरकी टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. कुलदीप मुख्य स्पिनर म्हणून खेळणार. कुलदीपचा चांगला फॉर्म टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्यात फायदेशीर ठरू शकतो.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

19 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

19 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

21 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

33 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

38 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago