Remal Cyclone : रेमल चक्रीवादळाचा जोरदार फटका! झाडे पडली, पत्रे उडाले आणि...

पंतप्रधान मोदी यांनीही घेतला परिस्थितीचा आढावा


मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेलं रेमल चक्रीवादळ (Cyclone Remal) आज पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकलं. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग १०० ते ११० किमी असल्यामुळे या चक्रीवादळाचा जोरदार फटका पश्चिम बंगाल किनारपट्टी भागाला बसला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे जवळील भागातील अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनीही चक्रीवादळाच्या स्थितीचा आढावा घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर दिशेने चक्रीवादळाचा प्रवास सुरू आहे. मात्र जमिनीवरील प्रवास सुरू झाल्याने कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरत जाईल असं भारतीय हवामान विभागाने सांगितलं. चक्रीवादळामुळे पावसाच्या सरी कोसळल्या असून अनेक भागात झाडंही कोसळली आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागातील सुमारे १ लाख १० हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.



नेमकं काय घडलं?


रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री ८.३० वाजता किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. त्यावेळी हे वादळ किनारपट्टीपासून ३० किमी दूर होते. मात्र, हळूहळू ते जवळ आले आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकले. रेमल वादळामुळे लाकडाची आणि बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की झाडेही उन्मळून पडली. अनेक किनारी भागात विजेचे खांबही उन्मळून पडल्याचे दिसून आले. सुंदरबनमधील गोसाबा परिसरात ढिगाऱ्याखाली येऊन एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिघा येथील किनारपट्टीवर उंच लाटा उसळताना दिसत आहेत. रेमलमुळे पश्चिम बंगालच्या संपूर्ण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला आहे.



बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसाची हजेरी


बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर एवढा वाढला की, किनाऱ्यालगत उभ्या असलेल्या बोटी पाण्याने भरल्या. मातीची आणि बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. किनाऱ्यालगतचे शेत आणि सखल भाग जलमय झाला आहे. घरांची छतं उडाली, विजेचे खांब तुटले आणि अनेक भागात झाडे उन्मळून पडली. कोलकात्याला लागून असलेल्या सखल भागातील रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली आहेत.



'या' जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा


भारतीय हवामान विभागाचे सोमनाथ दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळ धडकल्यामुळे दक्षिण बंगालमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा प्रभाव दिसून येईल. हवामान विभागाने चिरांग, गोलपारा, बक्सा, दिमा हासाओ, कचार, हैलाकांडी आणि करीमगंज जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर धुबरी, दक्षिण सलमारा, बोंगाईगाव, बजाली, तामुलपूर, बारपेटा, नलबारी, मोरीगाव, नागाव, होजई आणि पश्चिम कार्बी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर