Mumbai Rain : मुंबईकरांना दिलासा! वरुणराजा बरसणार तर 'या' भागात वातावरण आणखी तापणार

जाणून घ्या हवामान वृत्त काय म्हणते


मुंबई : देशासह राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पावसाच्या सरी (Rain) कोसळत आहेत. तर केरळमध्ये (Keral) मान्सूनच्या (Monsoon) आगमनाचे संकेत मिळत आहेत. अशातच हवामान विभागाने (Meteorological Department) या आठवड्यात मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्वचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार या भागात आज पावसाच्या सरी कोसळणार असून उन्हाची काहीली कमी होणार आहे. तर अजूनही काही भागात उष्णतेचे तापमान कायम राहण्याचा अंदाज दिला आहे.


मुंबई आणि कोकणात सध्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि काही उपनगरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच शहराचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहिल असे सांगितले आहे.



'या' भागात उष्णतेची लाट


पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राजस्थानमधील बारमेर येथे उच्चांकी ४८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.


दरम्यान, मुंबई, कोकण परिसरात पुढील दोन दिवसात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता असून १० जूनपर्यंत मुंबई व कोकणात मान्सूनचे आगमन होणार आहे. तर १५ जूनपर्यंत राज्यभरात मान्सून पसरण्याची शक्यता वर्तवली आहे.


Comments
Add Comment

Mumbai-Goa National Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पाच जण गंभीर

Mumbai-Goa National Highway accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणेनाका येथे शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या

Eknath Shinde : मोदींचा करिष्मा अन् अमित शहांची चाणक्यनीती यशस्वी

पश्चिम बंगालमध्ये जनतेने विकासाला दिला कौल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुवेंदू अधिकारी यांचे

SSC Result 2026 Marathi : दहावीच्या निकालातील धक्कादायक वास्तव : 'मायमराठी'तच राज्यातील ८० हजारांहून अधिक विद्यार्थी नापास!

एका बाजूला महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर

Satara Accident : नवा संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक ५० फूट दरीत कोसळून चिमुकल्यासह चौघांचा करुण अंत

सातारा : सातारा जिल्ह्यातील कासरतळे (Kaasratale) परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची नोंद झाली आहे. येथे

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून