Weather Update : उकाड्यापासून मिळणार दिलासा! 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या धारा

जाणून घ्या हवामान अभ्यासक काय म्हणतात


मुंबई : देशभरात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची काहीली होत असताना नागरिक मान्सूनची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच ३१ मे पासून केरळमध्ये (Keral) मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळणार असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं असून राज्यात लवकरच मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे.



'या' भागात जोरदार पावसाची शक्यता


हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते ५ जूनदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण, मराठवाडा या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही दिला आहे. त्यामुळे आता मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितलं.



मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?


८ जूननंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती डख यांनी दिली. सुरुवातीला राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद,लातूर, बीड परभणी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, संगमनेर, नाशिक, जालना, यवतमाळ, धुळे जळगाव या भागात १ ते ५ जूनदरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. तर पू्र्व विदर्भात देखील ६, ७, ९ जून दरम्यान चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे.


दरम्यान, या पावसाच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांची त्यांची सर्व शेतीकामे उरकून घ्यावीत, तसेच वादळी वाऱ्याच्या बाहेर पडू नये अशा काळात योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी