Weather Update : उकाड्यापासून मिळणार दिलासा! 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या धारा

जाणून घ्या हवामान अभ्यासक काय म्हणतात


मुंबई : देशभरात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची काहीली होत असताना नागरिक मान्सूनची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच ३१ मे पासून केरळमध्ये (Keral) मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळणार असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं असून राज्यात लवकरच मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे.



'या' भागात जोरदार पावसाची शक्यता


हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते ५ जूनदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण, मराठवाडा या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही दिला आहे. त्यामुळे आता मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितलं.



मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?


८ जूननंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती डख यांनी दिली. सुरुवातीला राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद,लातूर, बीड परभणी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, संगमनेर, नाशिक, जालना, यवतमाळ, धुळे जळगाव या भागात १ ते ५ जूनदरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. तर पू्र्व विदर्भात देखील ६, ७, ९ जून दरम्यान चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे.


दरम्यान, या पावसाच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांची त्यांची सर्व शेतीकामे उरकून घ्यावीत, तसेच वादळी वाऱ्याच्या बाहेर पडू नये अशा काळात योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण