Mumbai Ac Local : विनातिकीट घुसखोऱ्यांनो सावधान! मध्य रेल्वे आता चांगलाच धडा शिकवणार

मुंबई : महाराष्ट्रात सध्या उकाड्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे अनेकजण एसी लोकलमधून (AC Local) प्रवास करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे लोकल प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र एसी लोकलचे तिकीटाचे दर जास्त असल्यामुळे काहीजण विनातिकीट घुसखोरी करत प्रवास करताना दिसतात. या गोष्टीमुळे इतर प्रवाशांना गर्दीचा तसेच अन्य काही अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून (Central Railway) मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.


मध्य रेल्वेवर दररोज ६६ एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात. ज्यात जवळपास ७८ हजार ३२३ प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र या एसीमधून अनेकजण विनातिकीट प्रवास करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशा प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी मध्य रेल्वेने एक निर्णय घेतला आहे. तिकीट काढून एसी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सेंट्रल रेल्वेने एका स्पेशल मॉनेटरिंग टीमची स्थापना केली आहे. तर आता घुसखोऱ्यांविषयी तक्रार करण्यासाठी विशेष सेवा उपलब्ध करुन दिली आहे.



तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी


मध्य रेल्वेच्या टास्क फोर्सने एक व्हॉट्सअ‍ॅपवर हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर मेसेज करुन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तक्रार करता येणार आहे. ७२०८८१९९८७ या क्रमांकावर मेसेज करुन प्रवासी विनातिकीट प्रवाशांची, अनधिकृत व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास तक्रार करू शकणार आहेत. प्रवाशांना या क्रमांकावर केवळ मेसेज करुन तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर स्पेशल मॉनेटरिंग टीम साध्या वेशात येऊन कारवाई करेल. तातडीने तक्रारीचे निवारण न झाल्यास दुसऱ्या दिवशी टीम येऊन कारवाई करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली