Google Investment : विस्तारीकरणासाठी गुगलचा 'हा' मोठा निर्णय; तब्बल कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक

मुंबई : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलबाबत (Google) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जिओनंतर गुगलने आणखी एका नव्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात विस्तार करण्याच्या पार्श्वभूमीवर गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या क्षेत्रालाही या गोष्टीचा चांगलाच फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



गुगल 'या' कंपनीत गुंतवणार पैसे


ई- कॉमर्स क्षेत्रातील सर्वांत प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्ट (Flipcart) या कंपनीमध्ये गुगल गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. फ्लिपकार्ट कंपनी वॉलमार्ट कंपनीची उपकंपनी आहे. या फ्लिपकार्ट कंपनीचा काही हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव गुगलने ठेवला आहे. छोटी हिस्सेदारी खरेदी करून जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न गुगलकडून केला जात आहे. हा करार पूर्णत्त्वास गेल्यास गुगल अ‍ॅमेझॉनलाही (Amazon) ला टक्कर देणार आहे. ­



२९०० कोटी रुपये लावणार गुगल कंपनी


गुगल फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. ही गुंतवणूक साधारण ३५ कोटी डॉलर्स म्हणजेच २,९०० कोटी रुपयांची असू शकते. याबाबतची माहिती सध्या प्राथमिक स्तरावर असून लवकरच यावर ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



फ्लिपकार्टचा नेमका काय फायदा?


गुगलने ही गुंतवणूक केल्यास फ्लिपकार्टला क्लाऊट प्रोग्रॅमच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवता येईल. तसेच भारतातील संपूर्ण ग्राहकांना सेवा देण्यासाठी डिजिटल इन्फ्रा स्ट्रक्चर देखील मजबूत करता येणार आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या