S. Jaishankar : मतदार यादीत नावच नाही! परराष्ट्र मंत्र्यांना आला 'हा' विचित्र अनुभव

मात्र मतदान झाल्यानंतर मिळालं खास प्रमाणपत्र; नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदान (Voting) पाच टप्प्यांत पूर्ण झाले असून आज देशभरात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात दिल्ली, हरयाणा, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेशांतील ५८ जागांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत मतदानाच्या वेळी अनेकांची मतदार यादीत नावेच नसणे, मतदान केंद्र बदललेले असणे असे अनेक प्रकार समोर आले, ज्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांना देखील आज अशाच प्रकाराला सामोरं जावं लागलं. पण शेवटी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.


एस. जयशंकर सकाळी दिल्लीतील तुघलक लेनमधील अटल आदर्श शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदानाच्या रांगेत जवळपास २० मिनिटे उभेही राहिले, पण त्यांना त्या ठिकाणी मतदानच करता आलं नाही. येथील केंदातील मतदार यादीत त्यांचं नाव आढळून आलं नाही. त्यामुळे मतदान न करताच त्यांना घरी जावं लागलं. घरी जाऊन तपास केला असता त्यांचं मतदान केंद्र वेगळं असल्याचं समोर आलं. नंतर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.





मतदान झाल्यानंतर मिळालं खास प्रमाणपत्र


मतदान पार पडल्याची एक पोस्ट एस जयशंकर यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नवी दिल्लीतील लोकसभा मतदारसंघ-०४ मतदान केंद्र क्रमांक-५३ येथे एस जयशंकर यांनी मतदान केलं. त्या मतदान केंद्रावर मतदान करणारे ते पहिलेच पुरुष ठरले. तशा प्रकारचे प्रमाणपत्रही नवी दिल्लीच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने त्यांना देण्यात आले.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च