S. Jaishankar : मतदार यादीत नावच नाही! परराष्ट्र मंत्र्यांना आला 'हा' विचित्र अनुभव

  48

मात्र मतदान झाल्यानंतर मिळालं खास प्रमाणपत्र; नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदान (Voting) पाच टप्प्यांत पूर्ण झाले असून आज देशभरात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात दिल्ली, हरयाणा, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेशांतील ५८ जागांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत मतदानाच्या वेळी अनेकांची मतदार यादीत नावेच नसणे, मतदान केंद्र बदललेले असणे असे अनेक प्रकार समोर आले, ज्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांना देखील आज अशाच प्रकाराला सामोरं जावं लागलं. पण शेवटी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.


एस. जयशंकर सकाळी दिल्लीतील तुघलक लेनमधील अटल आदर्श शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदानाच्या रांगेत जवळपास २० मिनिटे उभेही राहिले, पण त्यांना त्या ठिकाणी मतदानच करता आलं नाही. येथील केंदातील मतदार यादीत त्यांचं नाव आढळून आलं नाही. त्यामुळे मतदान न करताच त्यांना घरी जावं लागलं. घरी जाऊन तपास केला असता त्यांचं मतदान केंद्र वेगळं असल्याचं समोर आलं. नंतर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.





मतदान झाल्यानंतर मिळालं खास प्रमाणपत्र


मतदान पार पडल्याची एक पोस्ट एस जयशंकर यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नवी दिल्लीतील लोकसभा मतदारसंघ-०४ मतदान केंद्र क्रमांक-५३ येथे एस जयशंकर यांनी मतदान केलं. त्या मतदान केंद्रावर मतदान करणारे ते पहिलेच पुरुष ठरले. तशा प्रकारचे प्रमाणपत्रही नवी दिल्लीच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने त्यांना देण्यात आले.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके