पुणे : १ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा (Deccan Queen) प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे (Mumbai-Pune) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे. पुणे-मुंबई या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे रुळावर धावणारी ही पहिली डिलक्स रेल्वे होती. या दख्खनच्या राणीचा दरवर्षी १ जून रोजी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येतो. आपल्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे प्रवासी या कार्यक्रमात सहभाग घेतात. यावर्षी डेक्कन क्वीनला सुरू होऊन ९७ वर्ष पूर्ण होणार आहेत. मात्र यंदा या राणीचा वाढदिवस हुकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रवाशांनीही नाराजीचा सूर मारला आहे. जाणून घ्या नेमकं कारण काय.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) प्लॅटफॉर्मचे विस्तारिकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० व ११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (Power Block) घेण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल (Local) आणि मेल- एक्स्प्रेसच्या (Express) वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
भायखळा ते सीएसएमटीदरम्यान घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे २८ ते ३१ मेदरम्यान अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्यावरून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेसचा समावेश असणार आहे. गाड्या रद्द करण्यात आल्याने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत.
दरम्यान, विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्ये मुंबई-पुणे इंटरसिटी, प्रगती एक्स्प्रेस चार दिवस रद्द राहणार आहे. तर १ आणि २ जून रोजी ‘डेक्कन क्वीन’ रद्द करण्यात आल्याने यंदाचा वाढदिवस रद्द होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…
परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…
हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…
मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…
चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…