Weather Update : मुंबई तापली पण 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा!

विजांच्या कडकडाटासह कोसळणार पावसाच्या सरी


मुंबई : पावसाळा (Monsoon) तोंडावर आला असला तरीही उकाड्यामुळे अंगाची काहीली होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे (Heatwave) नागरिक हैराण झाले आहेत. गरज असल्यास बाहेर पडण्याचं, तसेच काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून केलं जात आहे. अशातच हवामान विभागाने (Meteorological Department) मोठी अपडेट दिली आहे. आज राज्यात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असला तरीही काही भागात वादळी पावसाचा इशारा दिला आहे.



या भागात पावसाचा इशारा


हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र , उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा, हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



'या' जिल्ह्यात उष्ण लाटेचा यलो अलर्ट


नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईमध्ये देखील उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.



'या' राज्यात उष्णतेचा रेड अलर्ट


उत्तर भारतातील अनेक राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये पुढील ५ दिवस हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान ४८.८ अंशावर पोहोचलं आहे. तर जैसलमेरला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर तापमान ५३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. राजस्थानमधील वाढत्या उष्णतेमुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून उष्णतेची लाट कायम आहे.

Comments
Add Comment

बीडमधील अजब प्रकार, अधिक महिनेचं वाण मांजराची पोटात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील टाकरवण परिसरातील एका गावात अधिक मासानिमित्त घडलेल्या एका अनोख्या घटनेची सध्या जोरदार

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळली, २५ प्रवासी जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. रविवारी मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ झालेल्या

Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी

Jalna Bribe Case : पार्टी सुरू व्हायच्या आधीच वाजले बारा! एसीबीने जालनाच्या तहसीलदारांच्या घरात टाकला छापा

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक

Chitra Wagh : डहाणूतील संतापजनक प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक; दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला 'त्या' घटनेचा खुलासा

नाशिक : नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतर प्रकरणाचा (Religious conversion) तपास सुरू