Vidhan parishad Elections : विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुका जाहीर; कधी होणार मतदान?

पुढे ढकलण्यात आली होती निवडणूक... आता कसं असणार नवं वेळापत्रक?


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीतच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Vidhan parishad) ४ जागांसाठी निवडणुकांचा घाट घालण्यात आला होता. १० जून या दिवशी यासाठी मतदान होणार होते. मात्र, एका कारणास्तव या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. यानंतर आता या निवडणुकांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्या निवडणूक वेळापत्रकानुसार, २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.


विधानपरिषदेच्या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.



कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?


चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया ३१ मे रोजी सुरू होणार आहे. तर ७ जून हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर १० जून रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १२ जून आहे. प्रत्यक्ष मतदान हे २६ जून रोजी होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.



का पुढे ढकलली होती निवडणूक?


महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने २ मे ते १४ जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला असून शाळा १५ जून नंतर सुरु होणार आहेत. तसेच १७ जून ते २० जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असणार आहे. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक टिचर्स स्पेशल ट्रेनने ११ जून २०२४ रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. उपरोक्त सर्व बाबींचा विचार करुन ही निवडणूक पुढे ढकलली होती.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवर आज वांद्रे येथे 'मेजर ब्लॉक'

मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान 'जम्बो ब्लॉक मुंबई : वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान असलेल्या मोऱ्या

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न