Telecommunication : केंद्र सरकारची मोठी कारवाई! 'या' कारणामुळे तब्बल ६ लाख मोबाईल क्रमांक बंद

जाणून घ्या नेमकं कारण काय


मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा यासह मोबाईलही आता माणसाची मुलभूत गरज बनली आहे. मोबाईलचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातो. मात्र याच मोबाईलबाबत एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील तब्बल ६ लाख मोबाईल क्रमांक बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश मोबाईल युजर्स धोक्यात आले आहेत.


दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही मोबाईल क्रमांक हे चुकीचे कनेक्शन, बनावट ओळख व कागदपत्रांच्या आधारे घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाकडून मोबाईल कंपन्यांना ६ लाख ८० हजार मोबाईल कनेक्शनची पुन्हा तपासणी करण्यास सांगितली आहे. विभागाकडून या तपासासाठी ६० दिवसांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर पडताळणी न केल्यास हे संशयास्पद क्रमांक ब्लॉक केले जातील, अशी माहिती दिली आहे.



काय होणार कारवाई?


दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना या चिन्हांकित मोबाइल क्रमांकाची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांना ६० दिवसांच्या आत ओळखलेल्या कनेक्शनची पुन्हा पडताळणी करणे बंधनकारक आहे. पुन्हा पडताळणीमध्ये कनेक्शन अयशस्वी झाल्यास ते बंद केले जाईल.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना