Telecommunication : केंद्र सरकारची मोठी कारवाई! 'या' कारणामुळे तब्बल ६ लाख मोबाईल क्रमांक बंद

जाणून घ्या नेमकं कारण काय


मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा यासह मोबाईलही आता माणसाची मुलभूत गरज बनली आहे. मोबाईलचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातो. मात्र याच मोबाईलबाबत एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील तब्बल ६ लाख मोबाईल क्रमांक बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश मोबाईल युजर्स धोक्यात आले आहेत.


दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही मोबाईल क्रमांक हे चुकीचे कनेक्शन, बनावट ओळख व कागदपत्रांच्या आधारे घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाकडून मोबाईल कंपन्यांना ६ लाख ८० हजार मोबाईल कनेक्शनची पुन्हा तपासणी करण्यास सांगितली आहे. विभागाकडून या तपासासाठी ६० दिवसांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर पडताळणी न केल्यास हे संशयास्पद क्रमांक ब्लॉक केले जातील, अशी माहिती दिली आहे.



काय होणार कारवाई?


दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना या चिन्हांकित मोबाइल क्रमांकाची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांना ६० दिवसांच्या आत ओळखलेल्या कनेक्शनची पुन्हा पडताळणी करणे बंधनकारक आहे. पुन्हा पडताळणीमध्ये कनेक्शन अयशस्वी झाल्यास ते बंद केले जाईल.

Comments
Add Comment

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोड नवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ