IPL 2024: सनरायजर्स हैदराबादचा आयपीएलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

मुंबई: आयपीएल २०२४च्या फायनलचे दोन संघ अखेर ठरले आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ३६ धावांनी हरवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला २० षटकांत केवळ १३९ धावा करता आल्या.


हैदराबादने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत ९ बाद १७५ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानने पॉवरप्लेमध्ये एक बाद ५१ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर संघ ढेपाळला. राजस्थानला २० षटकांत केवळ १३९ धावाच करता आल्या. हैदराबादसाठी शाहबाज अहदमने ३ आणि अभिषेक शर्माने २ विकेट घेतल्या.


शाहबाजने यशस्वी जायसवाल, रियान पराग आणि आर अश्विनला बाद केले. तर अभिषेकने संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरला बाद केले. ध्रुव जुरेलने ३५ बॉलमध्ये नाबाद ५६ धावा करत राजस्थानला सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न फोल ठरले. जुरेलने आपल्या नाबाद खेळीमध्ये सात चौकार आणि दोन षटकार लगावले.

आधीच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. आता केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात २६ एप्रिलला लढत होणार आहे.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या