IPL 2024: सनरायजर्स हैदराबादचा आयपीएलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

  69

मुंबई: आयपीएल २०२४च्या फायनलचे दोन संघ अखेर ठरले आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ३६ धावांनी हरवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला २० षटकांत केवळ १३९ धावा करता आल्या.


हैदराबादने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत ९ बाद १७५ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानने पॉवरप्लेमध्ये एक बाद ५१ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर संघ ढेपाळला. राजस्थानला २० षटकांत केवळ १३९ धावाच करता आल्या. हैदराबादसाठी शाहबाज अहदमने ३ आणि अभिषेक शर्माने २ विकेट घेतल्या.


शाहबाजने यशस्वी जायसवाल, रियान पराग आणि आर अश्विनला बाद केले. तर अभिषेकने संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरला बाद केले. ध्रुव जुरेलने ३५ बॉलमध्ये नाबाद ५६ धावा करत राजस्थानला सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न फोल ठरले. जुरेलने आपल्या नाबाद खेळीमध्ये सात चौकार आणि दोन षटकार लगावले.

आधीच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. आता केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात २६ एप्रिलला लढत होणार आहे.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी