IPL 2024: सनरायजर्स हैदराबादचा आयपीएलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

मुंबई: आयपीएल २०२४च्या फायनलचे दोन संघ अखेर ठरले आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ३६ धावांनी हरवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला २० षटकांत केवळ १३९ धावा करता आल्या.


हैदराबादने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत ९ बाद १७५ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानने पॉवरप्लेमध्ये एक बाद ५१ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर संघ ढेपाळला. राजस्थानला २० षटकांत केवळ १३९ धावाच करता आल्या. हैदराबादसाठी शाहबाज अहदमने ३ आणि अभिषेक शर्माने २ विकेट घेतल्या.


शाहबाजने यशस्वी जायसवाल, रियान पराग आणि आर अश्विनला बाद केले. तर अभिषेकने संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरला बाद केले. ध्रुव जुरेलने ३५ बॉलमध्ये नाबाद ५६ धावा करत राजस्थानला सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न फोल ठरले. जुरेलने आपल्या नाबाद खेळीमध्ये सात चौकार आणि दोन षटकार लगावले.

आधीच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. आता केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात २६ एप्रिलला लढत होणार आहे.

Comments
Add Comment

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक