Electricity Demand : वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ; महावितरणला फुटला घाम!

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची कडक दक्षता


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे. उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच वाढत्या उष्णतेमुळे पंखा, एसी या विद्युत उपकरणांचा वापर वाढला असून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. कमी पडलेला पाऊस आणि विजेची वाढलेली मागणी याचा फटका आता राज्याला बसणार आहे. त्यामुळे राज्यावर सध्या लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे.


महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा ४३ ते ४४ अंशाच्या पलीकडे जात आहे. त्यातच विद्युत उपकरणांचा वापर प्रचंड वाढला आहे. यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत असली तरीही विजेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महावितरण अन्य वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करून महाराष्ट्राची विजेची गरज भागवत आहे. काल महावितरणाने २३ हजार ५७१ मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा केला. मात्र सातत्याने तापमानात वाढ होत असल्यामुळे वीज मागणी २४ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांचे कडक लक्ष


ग्रामीण भागातही वातानुकूलित यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे विजेची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे वीज टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याप्रकरणी कडक लक्ष ठेवले आहे. ते अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन वीज पुरवठ्याची काळजी घेत आहेत, अशी माहिती महावितरणचे अधिकारी यांनी दिली.


Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व