Electricity Demand : वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ; महावितरणला फुटला घाम!

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची कडक दक्षता


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे. उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच वाढत्या उष्णतेमुळे पंखा, एसी या विद्युत उपकरणांचा वापर वाढला असून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. कमी पडलेला पाऊस आणि विजेची वाढलेली मागणी याचा फटका आता राज्याला बसणार आहे. त्यामुळे राज्यावर सध्या लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे.


महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा ४३ ते ४४ अंशाच्या पलीकडे जात आहे. त्यातच विद्युत उपकरणांचा वापर प्रचंड वाढला आहे. यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत असली तरीही विजेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महावितरण अन्य वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करून महाराष्ट्राची विजेची गरज भागवत आहे. काल महावितरणाने २३ हजार ५७१ मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा केला. मात्र सातत्याने तापमानात वाढ होत असल्यामुळे वीज मागणी २४ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांचे कडक लक्ष


ग्रामीण भागातही वातानुकूलित यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे विजेची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे वीज टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याप्रकरणी कडक लक्ष ठेवले आहे. ते अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन वीज पुरवठ्याची काळजी घेत आहेत, अशी माहिती महावितरणचे अधिकारी यांनी दिली.


Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा