Water Shortage : मुंबईकरांवर पाणीबाणी! 'या' भागातील पाणीपुरवठा पुढचे दोन दिवस बंद

मुंबई : एकीकडे उष्णतेच्या लाटेसोबत मुंबईकरांना आता पाणीबाणीच्या संकटाचाही सामना करावा लागणार आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करुन ठेवावा, तसेच पाणी जपून वापरा असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई महापालिकेच्या वतीने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात जलवाहिनीचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दोन ठिकाणी १२०० मिलिमीटर व्यासाठी जलवाहिनी वळवण्याचे काम करण्यात येणार आहे. येत्या २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० या वेळेत करण्यात येणार आहे. परिणामी २४ तासांसाठी घाटकोपर, मुलुंड आणि भांडुपमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारी म्हणून ४ ते ५ दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.



'या' भागातील पाणीपुरवठा बंद


एन विभागातील विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज रुग्णाल आणि गोदरेज प्रॉपर्टीज भागातील पाणीपुरवठा २५ मे मध्यरात्रीपासून सकाळी ११.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.


तसेच एस विभाग - नाहूर (पूर्व), कांजूर (पूर्व) भांडुप (पूर्व), संपूर्ण परिसर, टागोर नगर, कन्नमवार नगर, मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर, सीएट टायर मार्ग लगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

Comments
Add Comment

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई