RR vs RCB: राजस्थानने विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मिळवले स्थान, RCBला ४ विकेटनी हरवले

  45

मुंबई: राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४ विकेटनी हरवले. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने या विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश घेतला आहे. आता त्यांचा सामना २४ मेला सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. आरसीबीने एलिमिनेटरमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना २० षटकांत ८ विकेट गमावत १७२ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत ६ विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले.


आरसीबीसाठी कोहलीने २४ बॉलमध्ये ३३ धावा केल्या. महिपाल लोमरोरने १७ बॉलमध्ये ३२ धावा केल्या. तर ग्रीन २७ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीसाठी बॉलिंग करताना सिराजने २ विकेट मिळवल्या. फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि ग्रीनने १-१ विकेट मिळवला.


राजस्थानसाठी यशस्वीने चांगली बॅटिंग केली. त्याने ३० बॉलमध्ये ४५ धावा केल्या. रियान परागने २६ बॉलमध्ये ३६ धावा केल्या. हेटमायरने १४ बॉलमध्ये २६ धावा केल्या. संजू सॅमसनने १७ धावा केल्या. राजस्थानसाठी बॉलिंग करताना आवेश खानने ३ विकेट घेतल्या. बोल्ट, संदीप आणि चहलने १-१ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी