RR vs RCB: राजस्थानने विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मिळवले स्थान, RCBला ४ विकेटनी हरवले

  54

मुंबई: राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४ विकेटनी हरवले. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने या विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश घेतला आहे. आता त्यांचा सामना २४ मेला सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. आरसीबीने एलिमिनेटरमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना २० षटकांत ८ विकेट गमावत १७२ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत ६ विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले.


आरसीबीसाठी कोहलीने २४ बॉलमध्ये ३३ धावा केल्या. महिपाल लोमरोरने १७ बॉलमध्ये ३२ धावा केल्या. तर ग्रीन २७ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीसाठी बॉलिंग करताना सिराजने २ विकेट मिळवल्या. फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि ग्रीनने १-१ विकेट मिळवला.


राजस्थानसाठी यशस्वीने चांगली बॅटिंग केली. त्याने ३० बॉलमध्ये ४५ धावा केल्या. रियान परागने २६ बॉलमध्ये ३६ धावा केल्या. हेटमायरने १४ बॉलमध्ये २६ धावा केल्या. संजू सॅमसनने १७ धावा केल्या. राजस्थानसाठी बॉलिंग करताना आवेश खानने ३ विकेट घेतल्या. बोल्ट, संदीप आणि चहलने १-१ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र