Pune water supply : मुंबईसह पुण्यातही पाणीटंचाईचं सावट!

जाणून घ्या नेमकं कारण काय


पुणे : काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा राज्यात उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. अशातच राज्यभरातील अनेक भागातील नागरिकांना एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसाळा जवळ येताच महापालिकेतर्फे उड्डाणपूल बांधणे, जलवाहिनी तसेच विद्युतविषयक कामांवर जोर दिला जातो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातच नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.


अशातच पुणे शहरातही देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने विविध कामे हाती घेतली असून संपूर्ण पुण्यात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच पुणेकरांना पाणी जपून वापरा असे कडक आवाहनही करण्यात आले आहे.


पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती टाकी परिसर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल. आर.) टाकी परिसर तसेच एस.एन.डी.टी. (एच.एल.आर.) टाकी परिसर व चतुःश्रृंगी टाकी परिसर तसेच लष्कर जलकेंद्र रॉ वॉटर पंपिंग, होळकर जलकेंद्र व चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीने देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी शनिवारी पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.


दरम्यान, पाणी विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, 'पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) काही पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर नागरी आणि विद्युत कामांचे नियोजन केले असल्याने शुक्रवारी अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही', असे म्हटले आहे.


Comments
Add Comment

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य