Election Commission : 'संविधान धोक्यात आहे' अशी वक्तव्यं करु नका!

  170

निवडणूक आयोगाची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


भाजप व काँग्रेसला धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे दिले आदेश


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदानाचे सर्व टप्पे पार पडले असून देशभरात मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. यासाठी राजकीय नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र या प्रचारादरम्यान, एकमेकांवर टीका करत असतानाच दोन प्रमुख पक्ष म्हणजेच भाजप व काँग्रेस (BJP and Congress) यांच्याकडून धार्मिक वक्तव्ये केली जात आहेत. टीकेची भाषा अत्यंत खालच्या पातळीला गेली आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या पक्षाध्यक्षांना धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच दोन्ही पक्षाध्यक्षांनी आपापल्या पक्षाला याबाबत नोटीस जारी करण्याची सूचना दिली आहे.


निवडणूक प्रचाराचा घसरलेला दर्जा पाहता आयोगाने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना अयोग्य विधाने न करण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी आणि शिष्टाचारात राहण्यासाठी औपचारिक नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जात, समुदाय, भाषा आणि धर्माचे नाव घेऊन प्रचार करु नये, तसेच अग्निवीर योजना आणि भारतीय संरक्षण दलांचे/ भारतीय सैन्याचे राजकारण न करण्याचा सल्ला काँग्रेसच्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांना दिला आहे. निवडणुकीमुळे भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणावर परिणाम होऊ नये, असेही आयोगाने म्हटले आहे.



निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


निवडणूक आयोगाने संविधानासंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंना एक विशेष सूचना दिली आहे. 'संविधान धोक्यात आहे' अशा प्रकारची वक्तव्यं न करण्याचा इशारा खरगेंना देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने