Election Commission : 'संविधान धोक्यात आहे' अशी वक्तव्यं करु नका!

  167

निवडणूक आयोगाची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


भाजप व काँग्रेसला धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे दिले आदेश


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदानाचे सर्व टप्पे पार पडले असून देशभरात मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. यासाठी राजकीय नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र या प्रचारादरम्यान, एकमेकांवर टीका करत असतानाच दोन प्रमुख पक्ष म्हणजेच भाजप व काँग्रेस (BJP and Congress) यांच्याकडून धार्मिक वक्तव्ये केली जात आहेत. टीकेची भाषा अत्यंत खालच्या पातळीला गेली आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या पक्षाध्यक्षांना धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच दोन्ही पक्षाध्यक्षांनी आपापल्या पक्षाला याबाबत नोटीस जारी करण्याची सूचना दिली आहे.


निवडणूक प्रचाराचा घसरलेला दर्जा पाहता आयोगाने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना अयोग्य विधाने न करण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी आणि शिष्टाचारात राहण्यासाठी औपचारिक नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जात, समुदाय, भाषा आणि धर्माचे नाव घेऊन प्रचार करु नये, तसेच अग्निवीर योजना आणि भारतीय संरक्षण दलांचे/ भारतीय सैन्याचे राजकारण न करण्याचा सल्ला काँग्रेसच्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांना दिला आहे. निवडणुकीमुळे भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणावर परिणाम होऊ नये, असेही आयोगाने म्हटले आहे.



निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


निवडणूक आयोगाने संविधानासंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंना एक विशेष सूचना दिली आहे. 'संविधान धोक्यात आहे' अशा प्रकारची वक्तव्यं न करण्याचा इशारा खरगेंना देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके