Election Commission : 'संविधान धोक्यात आहे' अशी वक्तव्यं करु नका!

निवडणूक आयोगाची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


भाजप व काँग्रेसला धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे दिले आदेश


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदानाचे सर्व टप्पे पार पडले असून देशभरात मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. यासाठी राजकीय नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र या प्रचारादरम्यान, एकमेकांवर टीका करत असतानाच दोन प्रमुख पक्ष म्हणजेच भाजप व काँग्रेस (BJP and Congress) यांच्याकडून धार्मिक वक्तव्ये केली जात आहेत. टीकेची भाषा अत्यंत खालच्या पातळीला गेली आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या पक्षाध्यक्षांना धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच दोन्ही पक्षाध्यक्षांनी आपापल्या पक्षाला याबाबत नोटीस जारी करण्याची सूचना दिली आहे.


निवडणूक प्रचाराचा घसरलेला दर्जा पाहता आयोगाने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना अयोग्य विधाने न करण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी आणि शिष्टाचारात राहण्यासाठी औपचारिक नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जात, समुदाय, भाषा आणि धर्माचे नाव घेऊन प्रचार करु नये, तसेच अग्निवीर योजना आणि भारतीय संरक्षण दलांचे/ भारतीय सैन्याचे राजकारण न करण्याचा सल्ला काँग्रेसच्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांना दिला आहे. निवडणुकीमुळे भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणावर परिणाम होऊ नये, असेही आयोगाने म्हटले आहे.



निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


निवडणूक आयोगाने संविधानासंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंना एक विशेष सूचना दिली आहे. 'संविधान धोक्यात आहे' अशा प्रकारची वक्तव्यं न करण्याचा इशारा खरगेंना देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या

Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेला निसर्गाचा 'ब्रेक'! मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रा स्थगित; ३६ तासांचा हाय अलर्ट

कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता

वाहतुकीच्या नियमाचे एका वर्षात पाच वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते

योग, आयुर्वेद अन् ॲलोपॅथीचा संगम

गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते 'हायब्रिड' पतंजली रुग्णालयाचे उद्घाटन  हरिद्वार  : भारताच्या आरोग्य क्षेत्रात

चारही पीठांचे शंकराचार्य १९ वर्षांनी एकाच व्यासपीठावर येणार

दिल्लीत गोमाता रक्षणासाठी १० मार्चला कार्यक्रम नवी दिल्ली: ज्योतिषपीठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद