Election Commission : 'संविधान धोक्यात आहे' अशी वक्तव्यं करु नका!

निवडणूक आयोगाची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


भाजप व काँग्रेसला धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे दिले आदेश


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदानाचे सर्व टप्पे पार पडले असून देशभरात मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. यासाठी राजकीय नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र या प्रचारादरम्यान, एकमेकांवर टीका करत असतानाच दोन प्रमुख पक्ष म्हणजेच भाजप व काँग्रेस (BJP and Congress) यांच्याकडून धार्मिक वक्तव्ये केली जात आहेत. टीकेची भाषा अत्यंत खालच्या पातळीला गेली आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या पक्षाध्यक्षांना धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच दोन्ही पक्षाध्यक्षांनी आपापल्या पक्षाला याबाबत नोटीस जारी करण्याची सूचना दिली आहे.


निवडणूक प्रचाराचा घसरलेला दर्जा पाहता आयोगाने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना अयोग्य विधाने न करण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी आणि शिष्टाचारात राहण्यासाठी औपचारिक नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जात, समुदाय, भाषा आणि धर्माचे नाव घेऊन प्रचार करु नये, तसेच अग्निवीर योजना आणि भारतीय संरक्षण दलांचे/ भारतीय सैन्याचे राजकारण न करण्याचा सल्ला काँग्रेसच्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांना दिला आहे. निवडणुकीमुळे भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणावर परिणाम होऊ नये, असेही आयोगाने म्हटले आहे.



निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


निवडणूक आयोगाने संविधानासंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंना एक विशेष सूचना दिली आहे. 'संविधान धोक्यात आहे' अशा प्रकारची वक्तव्यं न करण्याचा इशारा खरगेंना देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी